शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:46 IST

जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

ठळक मुद्दे२२ गावांचा समावेश : मधुकर कुकडे यांनी केली कलम १९३ अंतर्गत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द अर्थात इंदिरा सागर प्रकल्प आहे. १९८६ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. परंतु आजही या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या कायम आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर या परिसरातील २२ गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला होता. एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आता त्यांचा हा प्रश्न खासदार मधुकर कुकडे यांनी लोकसभेत उपस्थित केला. नियम १९९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.गोसेखुर्द प्रकल्पातील बाधितांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सिंचन पॅकेजचाही लाभ मिळाला नाही. घराचे पट्टेही अनेकांना मिळाले नाही. त्यामुळेच या परिसरातील २२ गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगत असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे लोकसभेत सांगितले. अनेक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या मुलासमोर रोजगाराचा प्रश्न आहे. अनेक प्रकल्पग्रस्त आज उपेक्षिताचे जिने जगत आहे. आपल्या भविष्याची शिदोरी या प्रकल्पाने हिरावून घेतली. शासनाने सरुवातीला त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु या आश्वासनाची पुर्तता पुर्नवसनात झाली नाही. अनेक समस्या आजही कायम आहेत. आजपर्यंत हा प्रश्न संसदेत कुणीही उपस्थित केला नव्हता. परंतु पोटनिवडणुकीनंतर खासदार झालेले मधुकर कुकडे यांनी या प्रश्नाला वाचा फोउली. या सर्वांच्या समस्या सोडविल्या तर भविष्यात ते निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाहीत. असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.बावनथडीचे पाणी शेतकऱ्यांना द्यातुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील १२ गावातील शेतकºयांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या मुद्यावरही खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेचे लक्ष वेधले. बावनथडी परिसर आदिवासी बहुल आहे. पाण्याअभावी शेती पिकेनाशी झाली आहे. या सर्व प्रकरणी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडण्याची गरज आहे. यातून विजेची बचत होईल आणि गावातील शेतकºयांनाही पाणी मिळेल असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.