शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:46 IST

जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

ठळक मुद्दे२२ गावांचा समावेश : मधुकर कुकडे यांनी केली कलम १९३ अंतर्गत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द अर्थात इंदिरा सागर प्रकल्प आहे. १९८६ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. परंतु आजही या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या कायम आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर या परिसरातील २२ गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला होता. एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आता त्यांचा हा प्रश्न खासदार मधुकर कुकडे यांनी लोकसभेत उपस्थित केला. नियम १९९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.गोसेखुर्द प्रकल्पातील बाधितांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सिंचन पॅकेजचाही लाभ मिळाला नाही. घराचे पट्टेही अनेकांना मिळाले नाही. त्यामुळेच या परिसरातील २२ गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगत असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे लोकसभेत सांगितले. अनेक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या मुलासमोर रोजगाराचा प्रश्न आहे. अनेक प्रकल्पग्रस्त आज उपेक्षिताचे जिने जगत आहे. आपल्या भविष्याची शिदोरी या प्रकल्पाने हिरावून घेतली. शासनाने सरुवातीला त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु या आश्वासनाची पुर्तता पुर्नवसनात झाली नाही. अनेक समस्या आजही कायम आहेत. आजपर्यंत हा प्रश्न संसदेत कुणीही उपस्थित केला नव्हता. परंतु पोटनिवडणुकीनंतर खासदार झालेले मधुकर कुकडे यांनी या प्रश्नाला वाचा फोउली. या सर्वांच्या समस्या सोडविल्या तर भविष्यात ते निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाहीत. असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.बावनथडीचे पाणी शेतकऱ्यांना द्यातुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील १२ गावातील शेतकºयांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या मुद्यावरही खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेचे लक्ष वेधले. बावनथडी परिसर आदिवासी बहुल आहे. पाण्याअभावी शेती पिकेनाशी झाली आहे. या सर्व प्रकरणी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडण्याची गरज आहे. यातून विजेची बचत होईल आणि गावातील शेतकºयांनाही पाणी मिळेल असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.