शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वगामी परतलेल्या युवकांना रोजगाराचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन ते अडीच हजारांच्या जवळपास कामगार व शेतमजूर युवक बाहेरून तालुक्यात आले आहेत. काही कुटुंब तेलंगणा राज्यातून ...

सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन ते अडीच हजारांच्या जवळपास कामगार व शेतमजूर युवक बाहेरून तालुक्यात आले आहेत. काही कुटुंब तेलंगणा राज्यातून आलेत तर काही नागपूर, पुणे आदी शहरांतून आले आहेत. तालुक्यातील नागरिक मुख्य: शेतीवर अवलंबून आहेत.

शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर युवक व शेतकरी हे रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. त्यानुसार रोजगारासाठी ते गेले होते; परंतु कोरोनामुळे तेथील रोजगार बंद झाल्याने ते गावाकडे परत आले आहेत. मात्र, त्यांच्यासमोर आता रोजगार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.

त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी एमआयडीसीची (औद्योगिक वसाहत) उभारणी आवश्यक आहे. तालुक्यात एमआयडीसीची मागणी तशी जुनीच आहे. निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो कोणीही असो, रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देत असतो; परंतु आश्वासनाची पूर्ती होत नाही. मात्र आता खऱ्या अर्थाने एमआयडीसीची उभारणी गरजेची झाली आहे. परजिल्हा, परदेश आणि परराज्यांतून परतलेल्या तरुणांच्या हाताला काम देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे.

अशी आहे तालुक्याची स्थिती

तालुक्यात १०९६८.८७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. ९७४०.१३ हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. २०४७२ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखालील आहे. ३२८२ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांखालील असून १८३९ हेक्टर क्षेत्र उन्हाळी पिकाखालील आहे. निसर्गाच्या लहरीपणावर तालुक्यातील शेती अवलंबून आहे. शेती पिकली नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो. तालुक्याच्या निर्मितीला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु शासनातर्फे अद्याप तालुक्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मजूर इतरत्र स्थलांतरित होत असतो.