शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 15, 2014 01:18 IST

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला मोठे भगदाड पडले आहे.

खापा-काटेबाम्हणी येथील वितरिका बावनथडी मुख्य वितरिकेला भगदाड

तुमसर :

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला मोठे भगदाड पडले आहे. वितरिकेच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा हा पुरावा आहे. धरणात पुढीलवर्षी शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट असल्याने मुख्य धरणाचे पिचींग कामे करण्यात येणार आहे. धान पिकाकरीता पाणी सोडण्याचे कारण पुढे गेले असले तरी येथे पिचींगकरीताच पाणी सोडण्यात आले अशी माहिती आहे. बावनथडी (राजीव सागर) आंतरराज्यीय प्रकल्प पूर्णत्वास आले. आतापर्यंत सुमारे दोन्ही राज्यांचे १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु येथील धरणापासून ते वितरिकेपर्यंतची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून आले आहे. बावनथडी प्रकल्पाच्या उजवी वितरीका खापा शिवारातून जाते. येथे मोठे भगदाड पडले आहे. अधिकारीवर्ग अनभिज्ञ दिसून येत आहे.

मागील एक महिन्यापासून या मुख्य वितरिकेतून धरणातील पाणी वाहत होते. महाराष्टÑ व मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प निकृष्ठ बांधकामामुळे पुढे कर्दनकाळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पाच्या वितरिका बांधकामात निकृष्ठ दजर्जाचे साहित्य वापरल्याने वितरीका फुटलेली आहे. भंडारा जिल्ह्याकरीता उजवा मुख्य कालवा तर मध्यप्रदेशाकरीता डावा मुख्य कालवा तयार करण्यात आला आहे. उजव्या वितरीकेची जबाबदारी बघेडा विभाग व शाखा दोनची जबाबदारी तुमसर विभागाकडे आहे. या वितरिकेच्या बांधकाम पिचींगला केवळ एक वर्ष झाले आहे. मागीलवर्षी या वितरिकेतून प्रायोगिक तत्वावर पाणी सोडले होते. तेव्हा या निकृष्ठ बांधकामाचे पितळ उघडे पडले होते. खापा ते काटेबाम्हणीकडे जाणार्‍या वितरिकेची दुर्दशा झाली आहे. खापा येथून केवळ एक कि.मी. अंतरावर वितरिकेला मोठे भगदाड पडले दिसते.

शाखा क्रमांक एक खापा जवळ वितरिकेच्या बांधकामाला एकच वर्ष झाले आहे, याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसत आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असता तर शेकडो हेक्टरमधील पीक वाहून जाण्याची भीती होती. धरणाचे दारे सुुद्धा काही दिवस बंद करण्यात आले होते. मुख्य वितरिकेला भगदाडाविषयी संब्धित अधिकार्‍यांना माहिती नाही. येथील कार्यरत अभियंते जबाबदारीबाबत एक विभाग दुसर्‍या विभागाची नावे सांगत आहेत. रामटेक-तुमसर या राज्य महामार्गावरील हाकेच्या अंतरावर वितरिकेला भगदाड पडले आहे. तर ३५ कि.मी. पर्यंत मुख्य धरणापर्यंत बांधकाम कसे झाले असेल याची प्रचिती येते. प्रकल्प व वितरिकेच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतु संबंधित विभागाने कोणतीच चौकशी केली नाही. मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार अशी स्थिती येथे दिसून येते. अनेक लहान वितरिकेची कामे शिल्लक करारानुसार सन २०१४ मध्ये पाणी साठवणूक व पाणी सोडणे अनिवार्य होते. त्यानुसार राज्य शासनाने तसा आदेश दिला. अधिकारी येथे शासनाला बांधकामाबाबत व भगदाडाविषयी सांगू शकत नव्हते. आदेश पाळणे बंधनकारक असल्याने पाणी सोडण्यात आले. लहान वितरिका येथे अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत. निधीची कमतरता हे एक प्रमुख कारण असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अजून तीन ते चार वर्ष येथे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)