शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

आधारभूत केंद्रावर हेक्टरी २० क्विंटलच धान खरेदी

By admin | Updated: November 20, 2015 01:24 IST

दिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य ....

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच : पडत्या दराने धान खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरूचराहुल भुतांगे तुमसरदिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य आणि एकरी ८ क्विंटल किंवा १२ पोते धानापेक्षा जास्त धान विकू नये, आधारभुत केंद्राने खरेदीही करु नये असा फतवा शासनाने काढला आहे. परिणामी शेतकऱ्याला चांगले उत्पन्न झाले असले तरी तो आधारभुत केंद्रावर धान्य विकू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्याचे फावत असून हमी भावापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी किंमतीत विकला जात आहे.यावर्षी कमी पाऊस आणि त्यानंतर किडीच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धान पिकाची शेतकऱ्यांनी मळणी केली. दिवाळीपुर्वी धानाची विक्री आधारभुत केंद्रावर करुन दिवाळी साजरी करण्याची आस हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना होती. मात्र आधारभुत खेरदी केंद्र सुरू होण्याची आशा धुसर झाल्याने शेतकऱ्यांना पडत्या दराने धान विकावे लागले. राज्य शासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे दिसताच लोकप्रतिनिधीनी दिवाळीपुर्वी आधारभुत खरेदी केंद्राचे फिती कापायला सुरुवात केली. पंरतु त्या आधारभुत केंद्रावर बारदाना (रिकामे पोते) पोहचले नसल्यामुळे प्रत्यक्षात तुमसर तालुक्याच्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी बारदाना पोहचला. त्यानंतर धान खरेदी करणे सुरु झाले. परंतु ग्रामीण भागात धान खरेदी सुरु झालेली नाही. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच ते तुमसर केंद्राला जोडलेल्या तुमसर, डोंगरला, येरली, कोष्टी, बोरी, उमरवाडा, नवरगाव, बाम्हणी, शिवणी, पांजरा, झारली, पचारा, लक्ष्मीपुर, हमेशा, ढोरवाडा, माडगी, चारगाव, सुकडी, देव्हाडी या १८ गावातील शेतकऱ्यांनी शेतातील धान्य आधारभुत केंद्रावर आणला. मात्र सातबारानुसार हेक्टरी २० क्विंटल म्हणजे ३० बोरे व एकरी ८ क्विंटल म्हणजे १२ बोरे धान शेतकऱ्यांना विक्री करता येऊ शकते, असा शासन निर्णय आल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी तुमसर येथील आधारभुत केंद्रावर गदारोळ केला. परंतु शासन निर्णय आधारभुत केंद्राच्या संचालकाने दाखविल्याने आधारभुत केंद्र उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे.मागीलवर्षी आघाडी शासनाच्या कार्यकाळात ही मर्यादा हेक्टरी ५० क्विंटल, एकरी २० क्विंटल होती. पंरतु युतीच्या शासनाने ही मर्यादा कमी करुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलल्याचे चित्र आहे. शासनाने एकरी ८ क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. त्याउपर नाही असे कुणी ठरविले? याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची दिशाभुल करुन राज्य सरकार व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.