शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आधारभूत केंद्रावर हेक्टरी २० क्विंटलच धान खरेदी

By admin | Updated: November 20, 2015 01:24 IST

दिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य ....

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच : पडत्या दराने धान खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरूचराहुल भुतांगे तुमसरदिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य आणि एकरी ८ क्विंटल किंवा १२ पोते धानापेक्षा जास्त धान विकू नये, आधारभुत केंद्राने खरेदीही करु नये असा फतवा शासनाने काढला आहे. परिणामी शेतकऱ्याला चांगले उत्पन्न झाले असले तरी तो आधारभुत केंद्रावर धान्य विकू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्याचे फावत असून हमी भावापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी किंमतीत विकला जात आहे.यावर्षी कमी पाऊस आणि त्यानंतर किडीच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धान पिकाची शेतकऱ्यांनी मळणी केली. दिवाळीपुर्वी धानाची विक्री आधारभुत केंद्रावर करुन दिवाळी साजरी करण्याची आस हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना होती. मात्र आधारभुत खेरदी केंद्र सुरू होण्याची आशा धुसर झाल्याने शेतकऱ्यांना पडत्या दराने धान विकावे लागले. राज्य शासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे दिसताच लोकप्रतिनिधीनी दिवाळीपुर्वी आधारभुत खरेदी केंद्राचे फिती कापायला सुरुवात केली. पंरतु त्या आधारभुत केंद्रावर बारदाना (रिकामे पोते) पोहचले नसल्यामुळे प्रत्यक्षात तुमसर तालुक्याच्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी बारदाना पोहचला. त्यानंतर धान खरेदी करणे सुरु झाले. परंतु ग्रामीण भागात धान खरेदी सुरु झालेली नाही. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच ते तुमसर केंद्राला जोडलेल्या तुमसर, डोंगरला, येरली, कोष्टी, बोरी, उमरवाडा, नवरगाव, बाम्हणी, शिवणी, पांजरा, झारली, पचारा, लक्ष्मीपुर, हमेशा, ढोरवाडा, माडगी, चारगाव, सुकडी, देव्हाडी या १८ गावातील शेतकऱ्यांनी शेतातील धान्य आधारभुत केंद्रावर आणला. मात्र सातबारानुसार हेक्टरी २० क्विंटल म्हणजे ३० बोरे व एकरी ८ क्विंटल म्हणजे १२ बोरे धान शेतकऱ्यांना विक्री करता येऊ शकते, असा शासन निर्णय आल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी तुमसर येथील आधारभुत केंद्रावर गदारोळ केला. परंतु शासन निर्णय आधारभुत केंद्राच्या संचालकाने दाखविल्याने आधारभुत केंद्र उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे.मागीलवर्षी आघाडी शासनाच्या कार्यकाळात ही मर्यादा हेक्टरी ५० क्विंटल, एकरी २० क्विंटल होती. पंरतु युतीच्या शासनाने ही मर्यादा कमी करुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलल्याचे चित्र आहे. शासनाने एकरी ८ क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. त्याउपर नाही असे कुणी ठरविले? याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची दिशाभुल करुन राज्य सरकार व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.