शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत केंद्रावर हेक्टरी २० क्विंटलच धान खरेदी

By admin | Updated: November 20, 2015 01:24 IST

दिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य ....

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच : पडत्या दराने धान खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरूचराहुल भुतांगे तुमसरदिवाळीपुर्वी उद्घाटन झालेल्या मात्र प्रत्यक्षात दिवाळीनंतरच खरेदी सुरु झालेल्या आधारभुत धान्य खेरदी केंद्रावर आता शेतकऱ्यांनी हेक्टरी २० क्विंटल किंवा ३० पोते धान्य आणि एकरी ८ क्विंटल किंवा १२ पोते धानापेक्षा जास्त धान विकू नये, आधारभुत केंद्राने खरेदीही करु नये असा फतवा शासनाने काढला आहे. परिणामी शेतकऱ्याला चांगले उत्पन्न झाले असले तरी तो आधारभुत केंद्रावर धान्य विकू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्याचे फावत असून हमी भावापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी किंमतीत विकला जात आहे.यावर्षी कमी पाऊस आणि त्यानंतर किडीच्या प्रादुर्भावातून वाचविलेल्या धान पिकाची शेतकऱ्यांनी मळणी केली. दिवाळीपुर्वी धानाची विक्री आधारभुत केंद्रावर करुन दिवाळी साजरी करण्याची आस हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना होती. मात्र आधारभुत खेरदी केंद्र सुरू होण्याची आशा धुसर झाल्याने शेतकऱ्यांना पडत्या दराने धान विकावे लागले. राज्य शासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे दिसताच लोकप्रतिनिधीनी दिवाळीपुर्वी आधारभुत खरेदी केंद्राचे फिती कापायला सुरुवात केली. पंरतु त्या आधारभुत केंद्रावर बारदाना (रिकामे पोते) पोहचले नसल्यामुळे प्रत्यक्षात तुमसर तालुक्याच्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी बारदाना पोहचला. त्यानंतर धान खरेदी करणे सुरु झाले. परंतु ग्रामीण भागात धान खरेदी सुरु झालेली नाही. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच ते तुमसर केंद्राला जोडलेल्या तुमसर, डोंगरला, येरली, कोष्टी, बोरी, उमरवाडा, नवरगाव, बाम्हणी, शिवणी, पांजरा, झारली, पचारा, लक्ष्मीपुर, हमेशा, ढोरवाडा, माडगी, चारगाव, सुकडी, देव्हाडी या १८ गावातील शेतकऱ्यांनी शेतातील धान्य आधारभुत केंद्रावर आणला. मात्र सातबारानुसार हेक्टरी २० क्विंटल म्हणजे ३० बोरे व एकरी ८ क्विंटल म्हणजे १२ बोरे धान शेतकऱ्यांना विक्री करता येऊ शकते, असा शासन निर्णय आल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी तुमसर येथील आधारभुत केंद्रावर गदारोळ केला. परंतु शासन निर्णय आधारभुत केंद्राच्या संचालकाने दाखविल्याने आधारभुत केंद्र उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे.मागीलवर्षी आघाडी शासनाच्या कार्यकाळात ही मर्यादा हेक्टरी ५० क्विंटल, एकरी २० क्विंटल होती. पंरतु युतीच्या शासनाने ही मर्यादा कमी करुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलल्याचे चित्र आहे. शासनाने एकरी ८ क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. त्याउपर नाही असे कुणी ठरविले? याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची दिशाभुल करुन राज्य सरकार व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.