शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

By admin | Updated: March 18, 2017 00:25 IST

अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, ...

माळी समाजाचा निषेध मोर्चा : तरूणीवरील सामूहिक अत्याचाराबद्दल संतापभंडारा : अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, यासह विविध मागण्यांचा आक्रोश करीत शेकडो माळी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. लाखांदूर येथील पीडित मुलीला न्याय व तिच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर पाच तरूणांनी जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार करून चित्रफित तयार केली. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या तरूणांनी अत्याचाराची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल केली. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. दरम्यान १५ दिवस ही चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झालेली असताना व अनेक पोलिसांनी ती बघितली असतानाही पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरूण घातले. त्यामुळे या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींसह प्रकरणावर पडदा पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करावे, असा आरोप माळी बांधवांनी केला आहे.शिक्षणासोबतच मोलमजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची चित्रफित तयार करून ती अनेक मोबाईलवर प्रसारीत करणे हा सायबर गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी यात तातडीने कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठबळ दिले. दरम्यान आरोपी व त्यांच्या कुटुंबियांनी पीडित मुलीला व तिच्या पालकांना पोलिसात तक्रार न देण्याची धमकी दिल्याने कुटुंबिय भयभीत झाले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्याकरिता अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, माधुरी देशकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, रविकिरण भुसारी, विजय शहारे, कैलास जामगडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.हुतात्मा स्मारक येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चेकऱ्यांची आपल्या भाषणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी व जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. मोर्चात अनिल डोंगरवार, भागवत किरणापुरे, रमेश गोटेफोडे, हेमंत नागरिकर, अनिल किरणापुरे, ललीत नागरिकर, राधेश्याम आमकर, नामदेव कांबळे, पवन तिजारे, प्रविन पेटकर, नानाजी आदे, अमोल गुरूनुले, रोहिनी पाटील, गायत्री इरले, प्रकाश लोखंडे, रवि शेंडे, राजोरा वाढई, माधुरी ऐनकर, सुनिता शाहकर यांच्यासह जिल्ह्यातील माळी समाजबांधव सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)