शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

By admin | Updated: March 18, 2017 00:25 IST

अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, ...

माळी समाजाचा निषेध मोर्चा : तरूणीवरील सामूहिक अत्याचाराबद्दल संतापभंडारा : अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, यासह विविध मागण्यांचा आक्रोश करीत शेकडो माळी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. लाखांदूर येथील पीडित मुलीला न्याय व तिच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर पाच तरूणांनी जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार करून चित्रफित तयार केली. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या तरूणांनी अत्याचाराची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल केली. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. दरम्यान १५ दिवस ही चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झालेली असताना व अनेक पोलिसांनी ती बघितली असतानाही पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरूण घातले. त्यामुळे या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींसह प्रकरणावर पडदा पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करावे, असा आरोप माळी बांधवांनी केला आहे.शिक्षणासोबतच मोलमजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची चित्रफित तयार करून ती अनेक मोबाईलवर प्रसारीत करणे हा सायबर गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी यात तातडीने कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठबळ दिले. दरम्यान आरोपी व त्यांच्या कुटुंबियांनी पीडित मुलीला व तिच्या पालकांना पोलिसात तक्रार न देण्याची धमकी दिल्याने कुटुंबिय भयभीत झाले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्याकरिता अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, माधुरी देशकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, रविकिरण भुसारी, विजय शहारे, कैलास जामगडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.हुतात्मा स्मारक येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चेकऱ्यांची आपल्या भाषणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी व जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. मोर्चात अनिल डोंगरवार, भागवत किरणापुरे, रमेश गोटेफोडे, हेमंत नागरिकर, अनिल किरणापुरे, ललीत नागरिकर, राधेश्याम आमकर, नामदेव कांबळे, पवन तिजारे, प्रविन पेटकर, नानाजी आदे, अमोल गुरूनुले, रोहिनी पाटील, गायत्री इरले, प्रकाश लोखंडे, रवि शेंडे, राजोरा वाढई, माधुरी ऐनकर, सुनिता शाहकर यांच्यासह जिल्ह्यातील माळी समाजबांधव सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)