शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूरला भोपळा!

By admin | Updated: May 18, 2016 00:27 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मागील दोन वर्षांपासून गुंडाळण्यात आल्यामुळे या योजनेंतर्गत एकही नळयोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना : साकोली, लाखनी, पवनी, मोहाडी, तालुक्यात प्रत्येकी केवळ एक योजनाभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मागील दोन वर्षांपासून गुंडाळण्यात आल्यामुळे या योजनेंतर्गत एकही नळयोजना प्रस्तावित करण्यात आली नाही. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना’ या नावाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेच्या आखाड्यातून लाखांदूर तालुक्याला वगळण्यात आले असून साकोली, लाखनी, पवनी, मोहाडी, तालुक्यात प्रत्येकी एका योजनेला मंजुरी देण्यात आली.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राज्य शासनाकडे तालुकानिहाय योजनांची कामे प्रस्तावित होती. यात भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (७० लाख रूपये), आमगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (७५.९५ लाख), गणेशपूर येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी (५६.८० लाख), भोजापूर येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (११६.४७ लाख) अशी ३ कोटी २२ लाख रूपयांची तर तुमसर तालुक्यात खापा येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (६३.२४ लाख), मिटेवानी येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (६२.०१ लाख), रूपेरा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (२३.८८ लाख), धनेगाव येथे पाणी पुरवठा योजनेसाठी (२३.३८ लाख) अशी १ कोटी ७२ लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली. साकोली तालुक्यात सुकळी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी (२९ लाख), लाखनी तालुक्यात घोडेझरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी (५८ लाख), मोहाडी तालुक्यात कांद्री येथील पाणी पुरवठा योजना दुरूस्तीसाठी (६१.५४ लाख), पवनी तालुक्यात चिचाळ येथे पाणी पुरवठा योजनेसाठी (६० लाख) प्रत्येकी एकाच कामाला आराखड्यात मंजुरी देण्यात आली असून लाखांदूर तालुक्याला संपूर्णत: वगळण्यात आले आहे.लाखांदूर तालुक्यात सोनी, चप्राड, कन्हाळगाव, विहीरगाव, जैतपूर तर पवनी तालुक्यात भावड, अड्याळ, जुनोना या गावात पाणी पुरवठा योजनेची कामे प्रस्तावित होती. परंतु आराखड्यातून या गावांना वगळण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दक्षता समितीची बैठक आजदक्षता संनियंत्रण समितीची बैठक बुधवारला सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत होत आहे. खासदार हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याची समस्या उदभवलेली असताना काही गावातीलच योजनांना मंजुरी देण्यात आली. या विषयावरून पदाधिकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.