शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

लाखांदूरला भोपळा!

By admin | Updated: May 18, 2016 00:27 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मागील दोन वर्षांपासून गुंडाळण्यात आल्यामुळे या योजनेंतर्गत एकही नळयोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना : साकोली, लाखनी, पवनी, मोहाडी, तालुक्यात प्रत्येकी केवळ एक योजनाभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मागील दोन वर्षांपासून गुंडाळण्यात आल्यामुळे या योजनेंतर्गत एकही नळयोजना प्रस्तावित करण्यात आली नाही. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना’ या नावाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेच्या आखाड्यातून लाखांदूर तालुक्याला वगळण्यात आले असून साकोली, लाखनी, पवनी, मोहाडी, तालुक्यात प्रत्येकी एका योजनेला मंजुरी देण्यात आली.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राज्य शासनाकडे तालुकानिहाय योजनांची कामे प्रस्तावित होती. यात भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (७० लाख रूपये), आमगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (७५.९५ लाख), गणेशपूर येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी (५६.८० लाख), भोजापूर येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (११६.४७ लाख) अशी ३ कोटी २२ लाख रूपयांची तर तुमसर तालुक्यात खापा येथील पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीसाठी (६३.२४ लाख), मिटेवानी येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (६२.०१ लाख), रूपेरा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी (२३.८८ लाख), धनेगाव येथे पाणी पुरवठा योजनेसाठी (२३.३८ लाख) अशी १ कोटी ७२ लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली. साकोली तालुक्यात सुकळी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी (२९ लाख), लाखनी तालुक्यात घोडेझरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी (५८ लाख), मोहाडी तालुक्यात कांद्री येथील पाणी पुरवठा योजना दुरूस्तीसाठी (६१.५४ लाख), पवनी तालुक्यात चिचाळ येथे पाणी पुरवठा योजनेसाठी (६० लाख) प्रत्येकी एकाच कामाला आराखड्यात मंजुरी देण्यात आली असून लाखांदूर तालुक्याला संपूर्णत: वगळण्यात आले आहे.लाखांदूर तालुक्यात सोनी, चप्राड, कन्हाळगाव, विहीरगाव, जैतपूर तर पवनी तालुक्यात भावड, अड्याळ, जुनोना या गावात पाणी पुरवठा योजनेची कामे प्रस्तावित होती. परंतु आराखड्यातून या गावांना वगळण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दक्षता समितीची बैठक आजदक्षता संनियंत्रण समितीची बैठक बुधवारला सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत होत आहे. खासदार हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याची समस्या उदभवलेली असताना काही गावातीलच योजनांना मंजुरी देण्यात आली. या विषयावरून पदाधिकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.