शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पोलीस विभागातर्फे जनजागरण मोहीम

By admin | Updated: June 28, 2014 23:27 IST

देशात सध्या दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया सुरू असून यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यासाठी यावर आळा घालण्यासाठी लोकांना जागृत करण्याची अत्यंत आवश्यकता असून

भंडारा : देशात सध्या दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया सुरू असून यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यासाठी यावर आळा घालण्यासाठी लोकांना जागृत करण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यासाठी जनजागरण मोहिम पोलीस विभागामार्फत सुरू झाली आहे.यासाठी दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया, भीषण दंगली आदीवर आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अतिआवश्यक पोस्टर्स बनवून सदर पोस्टर्स राज्य परिवहन विभागाच्या वाहनात, आॅटोरिक्षात, शाळेतील वाहनात लावण्यात आलेले असून जनतेसाठी घ्यावयाची खबरदारी बाबतच्या सूचना लावण्यात आलेले पोस्टर्स तयार करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील जनतेने सूचनांचे खबरदारी बाळगून सतर्कता बाळगावी, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)करडीत कृषी सहायकाची मागणीकरडी : करडी येथे अनेक दिवसांपासून कृषी सहायकाचे पद रिक्त आहे. प्रभार पालोरा येथील कृषी सहायकाकडे सोपविण्यात आला असला तरी त्यांचीही बदली झालेली आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असताना शेतकऱ्यांना सहायकाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्वरित कृषी सहायकाचे पद भरण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे व गावकऱ्यांनी केली आहे.करडी हे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातही नावीन्यपूर्ण शेतीत प्रयोग करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र शेतीसाठी मार्गदर्शन करणारा कृषी सहायकच गावात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पद रिक्त आहे. पालोरा येथील कृषी सहायकच गावात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पद रिक्त आहे. पालोरा येथील कृषी सहायकाकडे प्रभार देण्यात आला असला तरी त्यांचीही बदली झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत. खते, बी-बियाणे, माती परीक्षण, नांगरटी व पेरणीची पद्धत, लागवडीचे तंत्र यासंबंधीच्या मार्गदर्शनाची उणीव भासत आहे. त्वरित कृषी सहाय्यकाचे पद भरण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निशिकांत इलमे, मंगेश साठवणे, सोपान डाकरे, अमोल ढबाले, प्रकाश गाढवे व नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)