शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:45 IST

आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे. खºया अर्थाने जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्त ९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणाºया कलापथकाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून त्यासाठी सदासर्वदा सजग असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे साधारणत: रस्ते अपघात, दुष्काळ, पूरपरिस्थिती, आग, आजाराची साथ, चेंगराचेंगरी अशा प्रकारच्या आपत्ती घडतात. आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे नागरिकात जागृती करणे होय. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५५ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाºयांना सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन इतरांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहात पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, वर्क्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आपण एखाद्या जीव जरी वाचवू शकलो तरी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आपल्या हातून घडेल असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारा काळ हा आपत्ती व्यवस्थापनाचा काळ असून दुष्काळ, पूर व रस्ते अपघात या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.