शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:45 IST

आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे. खºया अर्थाने जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्त ९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणाºया कलापथकाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून त्यासाठी सदासर्वदा सजग असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे साधारणत: रस्ते अपघात, दुष्काळ, पूरपरिस्थिती, आग, आजाराची साथ, चेंगराचेंगरी अशा प्रकारच्या आपत्ती घडतात. आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे नागरिकात जागृती करणे होय. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५५ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाºयांना सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन इतरांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहात पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, वर्क्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आपण एखाद्या जीव जरी वाचवू शकलो तरी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आपल्या हातून घडेल असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारा काळ हा आपत्ती व्यवस्थापनाचा काळ असून दुष्काळ, पूर व रस्ते अपघात या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.