शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्रात व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सेवा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

करडी आरोग्यवर्धिनी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व अनुभवी कर्मचाऱ्यांची चमू उपलब्ध आहे. प्रशस्त दवाखाना इमारत व २५ च्या जवळपास बेड ...

करडी आरोग्यवर्धिनी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व अनुभवी कर्मचाऱ्यांची चमू उपलब्ध आहे. प्रशस्त दवाखाना इमारत व २५ च्या जवळपास बेड संख्या उपलब्ध आहे. गरज आहे ती शासन - प्रशासनाने संकट काळातील तातडीची मदत देण्यासाठी एक पर्यायी सेवा निर्माण करण्याची. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खेड्यापाड्यांतही सामाजिक संसर्ग वाढल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती दिसून येत आहे. सामाजिक सलोख्याची भावना लोप पावत चालली आहे. बऱ्याचदा रुग्णाला वेळेत उपचारासाठी शासकीय वाहन उपलब्ध होत नाही. तसेच धास्तीमुळे खासगी वाहनचालक शहरांपर्यंत वाहन देण्यास मनाई करीत असल्याने कोरोनाचे वादळ अधिक घोंघावताना दिसून येत आहे.

शहरांप्रमाणे खेड्यांतही मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपचारांच्या सुविधांअभावी अनेकांनी वाटेत दम सोडला. तर काहींनी शासकीय दवाखान्यात बेड व ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर्सची सुविधा न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात अत्यंत गैरसोयींचा सामना सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. तिसऱ्या टप्प्याचे संक्रमण रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांची व्याप्ती वाढविण्याची आजच नियोजन करणे काळाची गरज झाली आहे.

तेव्हा शासन व प्रशासनाने करडी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सदर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करडीचे सरपंच महेंद्र शेंडे, पालोराचे सरपंच महादेव बुरडे, माजी सरपंच भुपेंद्र पवनकर, खडकीचे सरपंच अश्विन बागडे, ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे, कान्हळगावचे सरपंच दिगांबर कुकडे, मुंढरीचे सरपंच एकनाथ चौरागडे, पांजरा (बोरी) चे सरपंच किरण शहारे, निलजचे सरपंच मोहतुरे, सरपंच सुवर्णा गाढवे, नवेगावचे सरपंच मोहतुरे, देव्हाडाचे उपसरपंच भाऊराव लाळे, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे, यांनी केली आहे.

तर ... उपचाराअभावी होणारे मृत्यू टाळता येतील

करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव आरोग्य केंद्र करडी येथे आहे. केंद्रांतर्गत पालोरा, जांभोरा, करडी, मुंढरी, निलज बुज व देव्हाडा खुर्द येथे उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू आणि चार ते पाचच्या संख्येत बेड उपलब्ध आहेत, तर करडी येथे २० ते २५ बेड उपलब्ध आहेत. शासन प्रशासनाने शासकीय रुग्णालयांत तसेच खासगी रुग्णालयात सुविधांअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास ग्रामिणांना मोठा दिलासा दिल्यासारखे होईल. तसेच उपचाराअभावी होणारे मृत्यूचे प्रमाणही कमी करता येईल, अशी कळकळीची भावना सरपंच महेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली आहे.