शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयासाठी ३५ हजार कोटींचा निधी त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन ...

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन हजार कोटींची तरतूद करून फसवणूक करण्यात आली. याचा विरोध करीत ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद ओबीसींसाठी अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करीत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याणमंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय व या मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महाज्योती या संस्थेची धुरा गैरओबीसी व्हीजेएनटी अधिकाऱ्याकडे देऊन सरकार ओबीसींची फसवणूक करीत आहे. मागील पाच वर्षांपासून ओबीसी मंत्रालयाचे सचिव असलेले जे.पी. गुप्ता यांनी कुठलाही चांगला कार्यक्रम किंवा विकासात्मक धोरण ओबीसींकरिता तयार केलेले नसून त्यांच्यावर ओबीसींच्या योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आहे. महाज्योती संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदावर अजूनही पूर्णकालीन व्यवस्थापक न दिल्याने प्रभारी व्यवस्थापकामुळे या संस्थेतूनही ओबीसी, बहुजन व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबविताना अडचणी निर्माण होत असल्याने या दोन्ही मुख्य पदावर ओबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील पूर्णवेळ अधिकारी नेमून सरकारने ओबीसी मंत्रालयाला न्याय द्यावे, असेही नमूद आहे.

शिष्टमंडळात अध्यक्ष बबलू कटरे, महासचिव मनोज मेंढे, शिशिर कटरे, कैलास भेलावे, खेमेंद्र कटरे, राजेश नागरीकर, सी.पी. बिसेन, सतीश मेश्राम, महेंद्र बिसेन, कमलनारायण कोरे, पप्पू पटले, मजहर शेख, गायधने, चौकलाल येळे, सरपंच उपराडे यांचा समावेश होता.

..या आहेत प्रमुख मागण्या

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह व वाचनालय सुरू करावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी व पदोन्नतीत आरक्षण द्यावे, ओबीसी, व्हीजे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता उत्पन्नाची अट एससी-एसटी संवर्गाप्रमाणे करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री-शिपकरिता लावण्यात आलेली उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात यावी, शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना त्वरित लागू करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वळता करावा व या महामंडळावर स्थानिक ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.