शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयासाठी ३५ हजार कोटींचा निधी त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन ...

गोंदिया : ओबीसी समाजाला मंडळ आयोगानुसार मिळालेल्या २७ टक्के आरक्षणानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे गरजेचे असताना फक्त तीन हजार कोटींची तरतूद करून फसवणूक करण्यात आली. याचा विरोध करीत ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद ओबीसींसाठी अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करीत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याणमंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय व या मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महाज्योती या संस्थेची धुरा गैरओबीसी व्हीजेएनटी अधिकाऱ्याकडे देऊन सरकार ओबीसींची फसवणूक करीत आहे. मागील पाच वर्षांपासून ओबीसी मंत्रालयाचे सचिव असलेले जे.पी. गुप्ता यांनी कुठलाही चांगला कार्यक्रम किंवा विकासात्मक धोरण ओबीसींकरिता तयार केलेले नसून त्यांच्यावर ओबीसींच्या योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आहे. महाज्योती संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदावर अजूनही पूर्णकालीन व्यवस्थापक न दिल्याने प्रभारी व्यवस्थापकामुळे या संस्थेतूनही ओबीसी, बहुजन व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबविताना अडचणी निर्माण होत असल्याने या दोन्ही मुख्य पदावर ओबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील पूर्णवेळ अधिकारी नेमून सरकारने ओबीसी मंत्रालयाला न्याय द्यावे, असेही नमूद आहे.

शिष्टमंडळात अध्यक्ष बबलू कटरे, महासचिव मनोज मेंढे, शिशिर कटरे, कैलास भेलावे, खेमेंद्र कटरे, राजेश नागरीकर, सी.पी. बिसेन, सतीश मेश्राम, महेंद्र बिसेन, कमलनारायण कोरे, पप्पू पटले, मजहर शेख, गायधने, चौकलाल येळे, सरपंच उपराडे यांचा समावेश होता.

..या आहेत प्रमुख मागण्या

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह व वाचनालय सुरू करावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी व पदोन्नतीत आरक्षण द्यावे, ओबीसी, व्हीजे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता उत्पन्नाची अट एससी-एसटी संवर्गाप्रमाणे करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री-शिपकरिता लावण्यात आलेली उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात यावी, शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना त्वरित लागू करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वळता करावा व या महामंडळावर स्थानिक ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.