शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा ...

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचा लाभ द्यावा. मात्र, याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले तर याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन तसेच विमा कंपन्यांची राहील, असा इशारा भीमशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात. यासाठी शेतकऱ्यांना बँका व खासगी सावकार तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्ज काढण्यासाठी अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून रितसर अर्ज सादर केल्यानंतर कर्ज मंजूर कले जाते. यावेळी संबंधित अर्जदार शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम कपात केली जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होऊन पीक उद्ध्वस्त झाल्यास पीक विमा कंपनीच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमानुसार अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा कायदा आहे.

सन २०२०-२१च्या खरीप हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी व वनस्पतीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पीक उद्ध्वस्त झाले तसेच भातपिकाची पैसेवारी पन्नास टक्केच्या आत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीसाठी पीक विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनदेखील अद्याप पीक विम्याचा लाभ अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, कर्जाची परतफेड कशी करावी, उसनवार कशी द्यावी, दैनंदिन व्यवहार कसा करावा, मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे आणि पुढील हंगामात जमिनीची मशागत व पिकांची पेरणी, लागवड कशी करावी आणि वितभर पोटाची खळगी कशी भरावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभे ठाकले आहेत.

तरीही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, ते वैफल्यग्रस्त, हवालदिल झाले आहेत. पीक विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र व राज्य सरकार तसेच पीक विमा कंपन्यांच्या अधिनस्त संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देत धोरणात्मक दिलासा देणारा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, नितीश काणेकर, सुरेश गेडाम, मोरेश्वर लेंधारे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, जितेंद्र खोब्रागडे, मच्चींद्र टेंभुर्णे यांची नावे आहेत.