शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा ...

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचा लाभ द्यावा. मात्र, याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले तर याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन तसेच विमा कंपन्यांची राहील, असा इशारा भीमशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात. यासाठी शेतकऱ्यांना बँका व खासगी सावकार तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्ज काढण्यासाठी अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून रितसर अर्ज सादर केल्यानंतर कर्ज मंजूर कले जाते. यावेळी संबंधित अर्जदार शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम कपात केली जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होऊन पीक उद्ध्वस्त झाल्यास पीक विमा कंपनीच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमानुसार अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा कायदा आहे.

सन २०२०-२१च्या खरीप हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी व वनस्पतीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पीक उद्ध्वस्त झाले तसेच भातपिकाची पैसेवारी पन्नास टक्केच्या आत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीसाठी पीक विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनदेखील अद्याप पीक विम्याचा लाभ अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, कर्जाची परतफेड कशी करावी, उसनवार कशी द्यावी, दैनंदिन व्यवहार कसा करावा, मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे आणि पुढील हंगामात जमिनीची मशागत व पिकांची पेरणी, लागवड कशी करावी आणि वितभर पोटाची खळगी कशी भरावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभे ठाकले आहेत.

तरीही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, ते वैफल्यग्रस्त, हवालदिल झाले आहेत. पीक विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र व राज्य सरकार तसेच पीक विमा कंपन्यांच्या अधिनस्त संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देत धोरणात्मक दिलासा देणारा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, नितीश काणेकर, सुरेश गेडाम, मोरेश्वर लेंधारे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, जितेंद्र खोब्रागडे, मच्चींद्र टेंभुर्णे यांची नावे आहेत.