शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा ...

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचा लाभ द्यावा. मात्र, याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले तर याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन तसेच विमा कंपन्यांची राहील, असा इशारा भीमशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात. यासाठी शेतकऱ्यांना बँका व खासगी सावकार तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्ज काढण्यासाठी अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून रितसर अर्ज सादर केल्यानंतर कर्ज मंजूर कले जाते. यावेळी संबंधित अर्जदार शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम कपात केली जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होऊन पीक उद्ध्वस्त झाल्यास पीक विमा कंपनीच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमानुसार अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा कायदा आहे.

सन २०२०-२१च्या खरीप हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी व वनस्पतीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पीक उद्ध्वस्त झाले तसेच भातपिकाची पैसेवारी पन्नास टक्केच्या आत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीसाठी पीक विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनदेखील अद्याप पीक विम्याचा लाभ अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, कर्जाची परतफेड कशी करावी, उसनवार कशी द्यावी, दैनंदिन व्यवहार कसा करावा, मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे आणि पुढील हंगामात जमिनीची मशागत व पिकांची पेरणी, लागवड कशी करावी आणि वितभर पोटाची खळगी कशी भरावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभे ठाकले आहेत.

तरीही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, ते वैफल्यग्रस्त, हवालदिल झाले आहेत. पीक विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र व राज्य सरकार तसेच पीक विमा कंपन्यांच्या अधिनस्त संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देत धोरणात्मक दिलासा देणारा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, नितीश काणेकर, सुरेश गेडाम, मोरेश्वर लेंधारे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, जितेंद्र खोब्रागडे, मच्चींद्र टेंभुर्णे यांची नावे आहेत.