शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा ...

भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महसूल तथा कृषी तसेच पीक विमा कंपनीच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचा लाभ द्यावा. मात्र, याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले तर याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन तसेच विमा कंपन्यांची राहील, असा इशारा भीमशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात. यासाठी शेतकऱ्यांना बँका व खासगी सावकार तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्ज काढण्यासाठी अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून रितसर अर्ज सादर केल्यानंतर कर्ज मंजूर कले जाते. यावेळी संबंधित अर्जदार शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम कपात केली जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होऊन पीक उद्ध्वस्त झाल्यास पीक विमा कंपनीच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमानुसार अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा कायदा आहे.

सन २०२०-२१च्या खरीप हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी व वनस्पतीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पीक उद्ध्वस्त झाले तसेच भातपिकाची पैसेवारी पन्नास टक्केच्या आत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीसाठी पीक विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनदेखील अद्याप पीक विम्याचा लाभ अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, कर्जाची परतफेड कशी करावी, उसनवार कशी द्यावी, दैनंदिन व्यवहार कसा करावा, मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे आणि पुढील हंगामात जमिनीची मशागत व पिकांची पेरणी, लागवड कशी करावी आणि वितभर पोटाची खळगी कशी भरावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभे ठाकले आहेत.

तरीही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, ते वैफल्यग्रस्त, हवालदिल झाले आहेत. पीक विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र व राज्य सरकार तसेच पीक विमा कंपन्यांच्या अधिनस्त संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देत धोरणात्मक दिलासा देणारा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, नितीश काणेकर, सुरेश गेडाम, मोरेश्वर लेंधारे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, जितेंद्र खोब्रागडे, मच्चींद्र टेंभुर्णे यांची नावे आहेत.