शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : शासन प्रशासनाच्या विद्युत वितरण विभागाने मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करणारा ...

भंडारा : शासन प्रशासनाच्या विद्युत वितरण विभागाने मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपासाठी चोवीस तास वीजपुरवठा करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात. धान पिकाच्या शेतीसाठी जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते. यासाठी गावागावात तळे तयार करण्यात आले. त्यानंतर शासन प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर, शेततळे, बोअरवेल या जलस्रोतांची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी रीतसर अर्ज सादर केला, अशा निकषपात्र शेतकऱ्यांना लाभांकित करण्यात आले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी स्वअर्थार्जनातून आपल्या शेतावर विहीर, बोअरवेल, शेततळे यासारख्या जलस्रोतांची व्यवस्था आहे आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी कृषी पंप वीजपुरवठ्यासाठी विद्युत वितरण विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे रीतसर अर्ज सादर केले असता संबंधित विभागाने कृषी पंप वीज जोडणी करून वीजपुरवठा सुरू केला आहे. परंतु कृषी पंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू राहत नसल्याने सिंचन कसे करावे व शेतातील पिके कशी जगवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी पंपाचा वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आल्याने सिंचनाअभावी शेतातील धान पिकाची रोपे करपत असून रोवणी खोळंबली आहे. सिंचनाअभावी धान पिकाची रोवणी कशी करावी, असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आवासून उभा ठाकला आहे. विद्युत वितरण विभागाच्या उपेक्षित धोरणामुळे धान उत्पादक शेतकरी नागवला जात असून ते हतबल, चिंतातुर, हवालदिल झाले आहेत.

शिष्टमंडळात भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, उमाकांत काणेकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, रतन मेश्राम, जयेंद्र मुल, विजय भोवते, डॉ. विवेक मोटघरे, नितीश काणेकर आदींचा समावेश होता.