भंडारा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेतीमाफियांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, जिल्हा खनिज निधीमधून सशस्त्र सुरक्षारक्षक देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूलमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नायब तहसीलदार व तलाठ्यावर हल्लाप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर सामुदायिक आंदोलन करण्यात येईल. याउपरही योग्य निर्णय न झाल्यास ८ मार्चपासून राज्यातील सर्व नायब तहसीलदार व तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात संघटनेचे तहसीलदार अक्षय पोयाम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, महेश पाटील, डीआरओ अर्चना यादव, उपजिल्हाधिकारी अश्विनी मोरे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार बी.डी. टेळे, उपजिल्हाधिकारी एस. एस. भस्के, सल्लागार राजू सक्करवार, एस. एस. मुरवतकर, नायब तहसीलदार आर.पी. निंबार्ते, नायब तहसीलदार अनिता गावंडे, नायब तहसीलदार विमल थोटे, नायब तहसीलदार एस. एम. हुकरे, नायब तहसीलदार बी. एस. पेंदाम, नायब तहसीलदार जी. यु. सोनकुसरे आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
नायब तहसीलदारांवरील त्या हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST