शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वृक्ष संवर्धनासह वन्यजीवांचे रक्षण करा!

By admin | Updated: October 4, 2016 00:33 IST

मानव व वन्यजीव यांचा जवळचा संबंध आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस जंगले ओसाड होत आहेत.

नाना पटोले यांचे आवाहन : वन्यजीव सप्ताहाला प्रारंभभंडारा : मानव व वन्यजीव यांचा जवळचा संबंध आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस जंगले ओसाड होत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला आहे. वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या नजरेत आहेत. अशा स्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. वन्यजीव सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, साकोलीचे वनाधिकारी मनोहर गोखले, योगेश वाघाये, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम उपस्थित होते. भंडारा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा व नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा वन विभागाद्वारे वन्यजीव सप्ताह या कालावधीत साजरा करण्याचे अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरीला पोलीस अधीक्षक विनिता शाहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सदर रॅली उपवनसंरक्षक कार्यालयापासून निघून जयस्तंभ चौक, भंडारा बसस्थानक, गांधी चौक, महाल रोड, गंगा संकुल चौक, मुस्लिम लायब्ररी बौक, जे.एम. पटेल कॉलेज रोड, जयस्तंभ चौक, उपवनसंरक्षक कार्यालयात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये विविध शाळेतील ८५० विद्यार्थी वन व वन्यजीव संबंधात स्लोगन असलेले फलक हाती घेऊन घोषणा देत होते. काही विद्यार्थी वन्यजीव वनसंवर्धन, पर्यावरण संबंधाने वेगवेगळी वेशभूषा धारण करून रॅलीत सहभागी झाले होते. तसेच काही विद्यार्थी वन व वन्यजीव संदर्भात फेस पेंटींग करून रॅलीत सहभागी झाले होते. त्या व्यतिरिक्त पथनाट्य, वृक्ष दिंडी पथक सहभागी झाले होते. या रॅलीत उपवनसंरक्षक, वनविभाग, उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, उपसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, एन.जी.ओ प्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे गणमान्य पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, या विभागाचे कार्यालयीन व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपानंतर विभागीय कार्यालय, वन विभागाचे परिसरात वन व वन्यजीवन संबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाला खासदार नाना पटोले, आ. रामचंद्र अवसरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये अतिथीनी वृक्ष संवर्धनासंदर्भात तसेच पर्यावरण, वन्यजीव, वन्यजीव संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रम तथा प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बेस्ट स्लोगन, बेस्ट ड्रेसींग व बेस्ट फेस पेंटींगकरिता विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येऊन गौरान्वित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सहभागी प्रत्येक शाळेला तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जनजागृतीच्या दृष्टीने वन व वन्यजीव संबंधाने प्रदर्शनी दाखविण्यात आली. (नगर प्रतिनिधी)