शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

महिला रूग्णालयाचा प्रस्ताव शासन दप्तरी अमान्य

By admin | Updated: June 4, 2017 00:13 IST

राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे.

जागेचा प्रश्न अधांतरी : युती शासनाकडूनही निराशाचलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे. या रूग्णालयासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असतानाही या बांधकामाचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला, हे विशेष.राज्यातील शासकीय ईमारतीच्या पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या ईमारत बांधकामांना मंजुरी देण्यासाठी विविध विभागांच्या सचिव समितीची बैठक मुंबई येथे मुख्य सचिवांच्या दालनात पार पडली. या बैठकीत सर्वच विभागाच्या ईमारतींच्या बांधकामाचा विषय असल्यामुळे त्या-त्या विभागाचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत वर्धा येथे नियोजन भवनासाठी १७.६७ कोटींचा निधी, चंद्रपूर येथे विक्रीकर भवनासाठी २१.४३ कोटींचा निधी, धुळे येथे आश्रमशाळेसाठी ८.१७ कोटींचा निधी, नगर जिल्ह्यातील राहुरी ग्रामीण रूग्णालयासाठी १७.३२ कोटींचा तर घोडेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी १२.४९ कोटींचा निधी आणि कोल्हापूर येथे प्रशासकीय ईमारतीसाठी ८.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु भंडारा येथे १०० खाटांचे स्वतंत्र महिला रूग्णालय व नवजात अर्भक केंद्र बांधकामाच्या ४३.८४ कोटी रूपयांच्या अंदाजपत्रक आराखड्याचा विषय या बैठकीत अमान्य करण्यात आला. याशिवाय काही जिल्ह्यातील ईमारत बांधकाम प्रस्तावही या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात भंडारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालय मंजूर झाले होते. तेव्हापासून या रूग्णालयासाठी अद्यापपर्यंत जागा मिळालेली नाही. त्यामुळे या रूग्णालयाची पायाभरणी अद्याप करण्यात आलेली नाही, हे विशेष.आरोग्य मंत्री गेले कुठे?भंडारा जिल्ह्यात लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य भंडाऱ्याचे, याशिवाय तीन विधानसभा सदस्य, एक विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदार संघाचे सदस्य आणि शिक्षक मतदार संघाचे सदस्य अशी भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची लांबलचक यादी असताना भंडाऱ्यात महिला रूग्णालय होऊ नये, ही शोकांतिका आहे. महिला रूग्णालयासाठी जागेचा शोध घेत आतापर्यंत सच्चिंद्रप्रताप सिंह, डॉ.माधवी खोडे, धीरजकुमार, अभिजीत चौधरी हे जिल्हाधिकारी आले आणि गेले आता सुहास दिवसे हे जिल्हाधिकारी आले आहेत परंतु जागेचा शोध अद्याप लागलेला नाही. या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री लाभले. त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्याची समस्या मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु आरोग्य मंत्र्याचे जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी मात्र कोणताही उपयोग अद्याप झालेला नाही.