शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महिला रूग्णालयाचा प्रस्ताव शासन दप्तरी अमान्य

By admin | Updated: June 4, 2017 00:13 IST

राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे.

जागेचा प्रश्न अधांतरी : युती शासनाकडूनही निराशाचलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे. या रूग्णालयासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असतानाही या बांधकामाचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला, हे विशेष.राज्यातील शासकीय ईमारतीच्या पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या ईमारत बांधकामांना मंजुरी देण्यासाठी विविध विभागांच्या सचिव समितीची बैठक मुंबई येथे मुख्य सचिवांच्या दालनात पार पडली. या बैठकीत सर्वच विभागाच्या ईमारतींच्या बांधकामाचा विषय असल्यामुळे त्या-त्या विभागाचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत वर्धा येथे नियोजन भवनासाठी १७.६७ कोटींचा निधी, चंद्रपूर येथे विक्रीकर भवनासाठी २१.४३ कोटींचा निधी, धुळे येथे आश्रमशाळेसाठी ८.१७ कोटींचा निधी, नगर जिल्ह्यातील राहुरी ग्रामीण रूग्णालयासाठी १७.३२ कोटींचा तर घोडेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी १२.४९ कोटींचा निधी आणि कोल्हापूर येथे प्रशासकीय ईमारतीसाठी ८.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु भंडारा येथे १०० खाटांचे स्वतंत्र महिला रूग्णालय व नवजात अर्भक केंद्र बांधकामाच्या ४३.८४ कोटी रूपयांच्या अंदाजपत्रक आराखड्याचा विषय या बैठकीत अमान्य करण्यात आला. याशिवाय काही जिल्ह्यातील ईमारत बांधकाम प्रस्तावही या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात भंडारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालय मंजूर झाले होते. तेव्हापासून या रूग्णालयासाठी अद्यापपर्यंत जागा मिळालेली नाही. त्यामुळे या रूग्णालयाची पायाभरणी अद्याप करण्यात आलेली नाही, हे विशेष.आरोग्य मंत्री गेले कुठे?भंडारा जिल्ह्यात लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य भंडाऱ्याचे, याशिवाय तीन विधानसभा सदस्य, एक विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदार संघाचे सदस्य आणि शिक्षक मतदार संघाचे सदस्य अशी भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची लांबलचक यादी असताना भंडाऱ्यात महिला रूग्णालय होऊ नये, ही शोकांतिका आहे. महिला रूग्णालयासाठी जागेचा शोध घेत आतापर्यंत सच्चिंद्रप्रताप सिंह, डॉ.माधवी खोडे, धीरजकुमार, अभिजीत चौधरी हे जिल्हाधिकारी आले आणि गेले आता सुहास दिवसे हे जिल्हाधिकारी आले आहेत परंतु जागेचा शोध अद्याप लागलेला नाही. या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री लाभले. त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्याची समस्या मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु आरोग्य मंत्र्याचे जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी मात्र कोणताही उपयोग अद्याप झालेला नाही.