शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पासाठी राखीव शेतजमिनीवरील निर्बंध कायम

By admin | Updated: April 1, 2015 00:35 IST

गोसीखुर्द प्रकल्प आणि त्यावर अवलंबून असलेल्या अन्य उपसा सिंचन योजनांसाठी आवश्यक जमिन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानंतरही ...

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्प आणि त्यावर अवलंबून असलेल्या अन्य उपसा सिंचन योजनांसाठी आवश्यक जमिन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानंतरही या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर राखीव ठेवण्यात आलेल्या शेतजमिनीचे हस्तांतरण, खरेदी-विक्री आदींवर लावण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आलेले नाही. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढून राखीव शेतजमिनीवर लादण्यात आलेल्या निर्बंधातून मुक्तता करणे आणि शेतकऱ्यांच्या अर्जावर निर्णय करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहे. परंतु, अर्जावर विचार होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सन २०१३ मध्ये नवीन भूसंपादन कायदा आणि सप्टेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर शेतकरी शेतजमिनीवरील निर्बंध हटविण्यासाठी अर्जावर अर्ज करीत आहेत. परंतु समस्या सुटलेल्या नाहीत. काय म्हणतो शासन निर्णयराज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात २० ते ३५ वर्षांपासून राखीव ठेवण्यात आलेल्या शेतजमिनीचे हस्तांतरणासंबंधी व्यवहारावरील निर्बंध हटविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देताना राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे. महसूल व वनविभागाचे उपसचिव र.म. आडे यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, कायदेशीर तरतुदीनुसार राखीव केलेल्या शेतजमिनीवरील निर्बंधामुळे भूधारकांसमक्ष त्यांची जमीन खरेदी-विक्री आणि हिस्से वाटप करण्यासाठी अडचणी येत आहेत.राज्यात अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत आणि प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात होणाऱ्या नागरीकरणामुळे शेतजमिनीवरील निर्बंध हटविण्याची मागणी सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांच्या असुविधेवर विचार करुन राज्य सरकारने सिंचन प्रकल्पातील लाभक्षेत्रात राखीव शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारासंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी हटविणे आणि पुनर्वसन अधिनियमाअंतर्गत निर्बंध रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (नगर प्रतिनिधी)