शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

प्रकल्पासाठी राखीव शेतजमिनीवरील निर्बंध कायम

By admin | Updated: April 1, 2015 00:35 IST

गोसीखुर्द प्रकल्प आणि त्यावर अवलंबून असलेल्या अन्य उपसा सिंचन योजनांसाठी आवश्यक जमिन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानंतरही ...

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्प आणि त्यावर अवलंबून असलेल्या अन्य उपसा सिंचन योजनांसाठी आवश्यक जमिन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानंतरही या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर राखीव ठेवण्यात आलेल्या शेतजमिनीचे हस्तांतरण, खरेदी-विक्री आदींवर लावण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आलेले नाही. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढून राखीव शेतजमिनीवर लादण्यात आलेल्या निर्बंधातून मुक्तता करणे आणि शेतकऱ्यांच्या अर्जावर निर्णय करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहे. परंतु, अर्जावर विचार होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सन २०१३ मध्ये नवीन भूसंपादन कायदा आणि सप्टेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर शेतकरी शेतजमिनीवरील निर्बंध हटविण्यासाठी अर्जावर अर्ज करीत आहेत. परंतु समस्या सुटलेल्या नाहीत. काय म्हणतो शासन निर्णयराज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात २० ते ३५ वर्षांपासून राखीव ठेवण्यात आलेल्या शेतजमिनीचे हस्तांतरणासंबंधी व्यवहारावरील निर्बंध हटविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देताना राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे. महसूल व वनविभागाचे उपसचिव र.म. आडे यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, कायदेशीर तरतुदीनुसार राखीव केलेल्या शेतजमिनीवरील निर्बंधामुळे भूधारकांसमक्ष त्यांची जमीन खरेदी-विक्री आणि हिस्से वाटप करण्यासाठी अडचणी येत आहेत.राज्यात अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत आणि प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात होणाऱ्या नागरीकरणामुळे शेतजमिनीवरील निर्बंध हटविण्याची मागणी सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांच्या असुविधेवर विचार करुन राज्य सरकारने सिंचन प्रकल्पातील लाभक्षेत्रात राखीव शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारासंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी हटविणे आणि पुनर्वसन अधिनियमाअंतर्गत निर्बंध रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (नगर प्रतिनिधी)