शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

अड्याळातील समस्या ‘जैसे थे’

By admin | Updated: July 29, 2014 23:40 IST

४० गावांचा भार असलेल्या अड्याळ गावाला उपतालुक्याचा दर्जा प्राप्त असला तरी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अर्धा विकास बाकी भका अशी अवस्था झाली आहे. जुने विधानसभा

अड्याळ : ४० गावांचा भार असलेल्या अड्याळ गावाला उपतालुक्याचा दर्जा प्राप्त असला तरी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अर्धा विकास बाकी भका अशी अवस्था झाली आहे. जुने विधानसभा मतदार संघ व राजकारण्यांचा बालेकिल्ला असलेल्या अड्याळ गावाला अनेक समस्यांनी ग्रासले असल्यामुळे अड्याळ गावाला कधी येणार अच्छे दिन म्हणून नागरिकांत शासन व्यवस्थेविषयी रोष व्यक्त केल्या जात आहे.२३ वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या फोल आश्वासनाच्या रांगेत उभा असलेल्या अड्याळ तिर्थस्थळाला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. येथील नायब तहसील कार्यालय नावापुरतेच आहे. नायब तहसीलदार आठवड्यातून फक्त दोनच दिवस येतात तर कधी येतच नाही. त्यामुळे पवनी येथे जावून आर्थिक व मानसिक मनस्ताप जनतेला करावा लागतो. मागील महिन्यात जिल्हाधिकारी यांनी अड्याळ ग्रामपंचायतला भेट दिली तेव्हा नायब तहसीलदाराचे एक दिवस वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेही आश्वासन हवेतच विरले. गेल्या आठ महिन्यापासून अड्याळ ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी नाही. आहेत तेही आठवड्यातून दोन दिवसांसाठी कोंढा येथील ग्रामपंचायत व अड्याळ ग्रामपंचयत सांभाळाणी लागते. १७ सदस्य संख्या व १८ हजार लोकसंख्येची धुरा असलेल्या ग्रामपंचायत येथे रेगुलर ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे तर तलाठी यांचीसुद्धा बदली झाल्यामुळे तलाठी कार्यालयात तलाठी मानकर यांच्याकडे सुद्धा दोन कार्यालयाचा भार देण्यात आला आहे. येथील समस्या पुढाऱ्यांना दिवसत नसाव्या काय, हाही एक प्रश्न गावकऱ्यांत आहे. मात्र यांचा मनस्ताप गावकऱ्यांना सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रुग्णालयात मंजूर पदापैकी १० पदे रिक्त असून एकच डॉक्टरच्या भरोष्यावर ग्रामीण रुग्णालयाची धुरा आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना रेफर टु भंडारा असे सांगण्यात येते. प्रभारी अधिकाऱ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयाची धुरा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या भवनाची दैनावस्था झाली आहे. हे भवन झाले तेव्हापासूनच एकही कार्यक्रम झाले नाही. दरवाजे, खिडक्या चोरट्यांनी चोरून नेले आहे. आता तिथे जुगार खेळल्या जातो. येथे खाजगी दोन मंगल कार्यालय आहेत परंतु गरीब सर्वसामान्य नागरिकांना लग्न व इत्यादी कार्यक्रमासाठी २० ते २५ हजार मोजावे लागतात. या सांस्कृतिक भवनाची डागडुजी करून दुरूस्ती केली तर सर्व सामान्य नागरिकांना त्यांचा फायदा होईल. शिक्षणाचे मुख्य केंद्र असल्यामुळे परिसरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. येथील बसस्थानकावर विद्यार्थी व प्रवाशांसाठी पुरेशा सोई नाहीत. बसस्थानक अतिक्रमाणाच्या विळख्यात आहे. काही व्यावसायीकांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली असून याचा त्रास होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत अतिक्रमण काढावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)