शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बपेरा पुनर्वसन वसाहतीत समस्याच समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:39 IST

चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या बपेरा गावात १२५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी या ...

चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या बपेरा गावात १२५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी या वसाहतीत समस्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. शौचालयाची टाकी ओव्हरफ्लो झाली आहे, तर छत गळत असल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अन्य सुविधांसाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाने पुनर्वसित नागरिकांना मदतीचा हात देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वैनगंगा, बावनथडी नदीच्या संगम तिरावर असलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या बपेरा गावाने नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याची झळ सोसली आहे. गावांतील ८५ हेक्टर आर शेती नदीच्या वाढत्या पात्राने गिळंकृत केली आहे. शेतशिवारात असणाऱ्या विहिरी कवेत घेतल्या आहेत. गावातील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक सधन शेतकरी शेतमजूर झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती गावकऱ्यांवर कोसळली असताना तत्कालीन युती शासनाच्या काळात शेतकऱ्यांना छदामही मिळाला नाही. शेतकऱ्यांना शेतसारा माफी देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला आहे. दरम्यान, गावात नद्यांचे पाणी शिरत असल्याने प्रचंड नासाडी गावकऱ्यांनी अनुभवली आहे. गावांच्या पुनर्वसनासाठी गावकऱ्यांनी मोठा संघर्ष केला आहे. पुनर्वसनासाठी करण्यात आलेले २४ तासांचे रास्ता रोको आंदोलन जगजाहीर आहे. यानंतर युती शासनाच्या काळात दोन टप्प्यांत गावातील पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली आहे. २००७ मध्ये शहरी पॅटर्न अंतर्गत १२५ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली होती. गावांच्या शेजारी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आल्यानंतर घरांचे बांधकाम करण्यात आले होते. लॉटरी पद्धतीने घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. परंतु हेच घराचे बांधकाम वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या जिव्हारी लागले आहे. अवघ्या १३ वर्षांत छतातून पाणी गळत आहे. छताचे सिमेंट कोसळत असून छत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे पुनर्वसित घरात जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. याच पुनर्वसित घरांत शौचालयाच्या पाइपमध्ये गडर देण्यात आले आहे. स्वतंत्र खड्डे खोदकाम करण्यात आले नाही. शहरी पॅटर्न असल्याने कुणी विरोध केला नाही. ही गडर ओव्हरफ्लो झाली आहेत. याच वसाहतीत वीजपुरवठा खंडित आहे. रानडुकरांची भीती नागरिकांना सतावत आहे. रात्री कुणी घराबाहेर पडत नाहीत. ग्राम पंचायत या वसाहतीत सुविधा पुरवायला गेले तर निधी नाही. निधीअभावाचे रोष पदाधिकाऱ्यांवर येत आहेत.

बॉक्स

१६९ नागरिकांचे पुनर्वसन अडले

बपेरा गावात दोन टप्प्यांत पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १२५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबीयांचे अडले आहे. पुनर्वसनाच्या हालचालींना वेग देण्यात आला नाही. जी घरे उर्वरित पुनर्वसन यादीत आहेत अशा घरांत गेल्या वर्षात पाणी शिरले होते. परंतु कुणी बोलले नाही. उर्वरित पुनर्वसन करण्यासाठी मुंबई दरबारात असणाऱ्या फाइलवरून धूळ काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे उर्वरित पुनर्वसन बेदखल झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी उर्वरित पुनर्वसन कार्याची दखल घेण्याची गरज आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

बावनथडी नदीच्या पात्रात गावातील ८५ हेक्टर आर शेती गेली आहे. बागायती शेती गेल्याने शेतकऱ्यांनी डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक आपत्ती असताना शासनाची मदत मिळाली नाही. युती, आघाडी, महाविकास आघाडी असा प्रवास गावातील शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरपंच ममता राऊत यांनी पत्रव्यवहार केला आहे.