शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

डोंगरगावात समस्याच समस्या

By admin | Updated: June 19, 2016 00:23 IST

गोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

गट ग्रामपंचायतीचा फटका : ना पावसाचा ठाव, ना स्वच्छतेचा ठिकाणा, पाणीटंचाईची झळविशाल रणदिवे अड्याळगोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. मूलभूत सुविधा सोडविण्यात अकार्यक्षम प्रणालीचा वापर होत असल्याने डोंगरगाव येथील ग्रामस्थांशी भेदभाव होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अड्याळ येथून सहा कि़मी. अंतरावर ४०० लोकसंख्या असलेल्या डोंगरगावात एकूण तीन बोरवेल आहेत. त्यापैकी एका बोरवेलला पाण्याचा अल्प पुरवठा होत आहे. दुसऱ्या बोरवेलची पाणीपुरवठा करण्याची क्षमता उत्तम असली तरी ती दूर अंतरावर आहे. त्यामुळे एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांची निराशा दिसून येते. तिसऱ्या बोरवेलमध्ये तांत्रिक बिघाड आहे. त्यामुळे या बोरवेलवर खर्च करण्यात आलेली रक्कम पाण्यात गेल्याची ओरड आहे. डोंगरगाव येथे २० दिवसापुर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्यात आला. परंतु कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावण्यात आली नाही. परिणामी कचरा पुन्हा नालीत साचलेला आहे. नळधारकांना केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी भांडणे होणे नित्याचे झाले आहे. ग्रामपंचायतीत डोंगरगावाचा समावेश असला तरी या ग्रामपंचायतीमध्ये डोंगरगावचा एकही पदाधिकारी नाही. पदाधिकारी नसल्यामुळे समस्यांचा अंबार गावात दिसून येतो, अशी ओरड डोंगरगाववासी करीत आहे. समस्या बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात यावे. नागरिकांची समस्या जाणावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.