शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांना प्रदूषित पाण्याचा फटका । गोसेखुर्दमधील नागनदीचे प्रदूषण कायम बंद व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये शहरातील ३४५ ते ३६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जाते. हे सांडपाणी नागनदी सोबत अन्य चार नद्यांसोबत आंभोरा येथे वैनगंगा नदीला मिळते. हे प्रदूषीत झालेले वैनगंगा नदीचे पाणी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणात जमा होते.नागनदीच्या प्रवाहामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित झालेले पाणी दूरपर्यंत, भंडारा शहरापर्यंतपसरले आहे. पवनी तालुक्यातील २५ गावे व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रदुषीत झाले आहे. येथील लोकांना विषमज्वर, कावीळ आदी आजारांची नेहमी लागण होत असते. काठावरील गावाजवळ डासांची मोठ्या प्रामणात या प्रदुषीत पाण्यामुळे निर्मीती झाली आहे. त्यामुळे मलेरीया, विषाणुजन्य ताप, डेंगू सदृष ताप आदींशी येथील जनतेला नेहमी सामना करावा लागतो.या प्रदुषीत पाण्याचा फटका भंडारा शहर, पवनी शहर व अनेक गावांना बसत आहे. हे प्रदुषीत पाणी नाईलाजाने येथील जनतेला प्यावे लागत आहे. नागनदीचे प्रदुषण थांबवीण्याकरीता नागपूर महानगर पालीकेने केंद्र सरकार कडे पाठवीलेला १३२८ कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर ही झाला. पण अजुनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे नागनदीचे प्रदुषण कमी झालेले नाही व उलट वाढलेले आहे.विद्यमान परिस्थितीत पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, यात शंका नाही. दिवसेंगणिक पाण्याची पातळी कमी होत असताना जीवनदायीनी नद्यांचे पाणीही दूषित झाले आहे. ही मानवासह जलचरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याचे नमुने निरीनेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यात आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरतील, असे तत्व आढळले होते. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागनदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण अभ्यासक