शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांना प्रदूषित पाण्याचा फटका । गोसेखुर्दमधील नागनदीचे प्रदूषण कायम बंद व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये शहरातील ३४५ ते ३६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जाते. हे सांडपाणी नागनदी सोबत अन्य चार नद्यांसोबत आंभोरा येथे वैनगंगा नदीला मिळते. हे प्रदूषीत झालेले वैनगंगा नदीचे पाणी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणात जमा होते.नागनदीच्या प्रवाहामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित झालेले पाणी दूरपर्यंत, भंडारा शहरापर्यंतपसरले आहे. पवनी तालुक्यातील २५ गावे व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रदुषीत झाले आहे. येथील लोकांना विषमज्वर, कावीळ आदी आजारांची नेहमी लागण होत असते. काठावरील गावाजवळ डासांची मोठ्या प्रामणात या प्रदुषीत पाण्यामुळे निर्मीती झाली आहे. त्यामुळे मलेरीया, विषाणुजन्य ताप, डेंगू सदृष ताप आदींशी येथील जनतेला नेहमी सामना करावा लागतो.या प्रदुषीत पाण्याचा फटका भंडारा शहर, पवनी शहर व अनेक गावांना बसत आहे. हे प्रदुषीत पाणी नाईलाजाने येथील जनतेला प्यावे लागत आहे. नागनदीचे प्रदुषण थांबवीण्याकरीता नागपूर महानगर पालीकेने केंद्र सरकार कडे पाठवीलेला १३२८ कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर ही झाला. पण अजुनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे नागनदीचे प्रदुषण कमी झालेले नाही व उलट वाढलेले आहे.विद्यमान परिस्थितीत पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, यात शंका नाही. दिवसेंगणिक पाण्याची पातळी कमी होत असताना जीवनदायीनी नद्यांचे पाणीही दूषित झाले आहे. ही मानवासह जलचरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याचे नमुने निरीनेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यात आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरतील, असे तत्व आढळले होते. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागनदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण अभ्यासक