शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

नागनदीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांना प्रदूषित पाण्याचा फटका । गोसेखुर्दमधील नागनदीचे प्रदूषण कायम बंद व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये शहरातील ३४५ ते ३६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जाते. हे सांडपाणी नागनदी सोबत अन्य चार नद्यांसोबत आंभोरा येथे वैनगंगा नदीला मिळते. हे प्रदूषीत झालेले वैनगंगा नदीचे पाणी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणात जमा होते.नागनदीच्या प्रवाहामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित झालेले पाणी दूरपर्यंत, भंडारा शहरापर्यंतपसरले आहे. पवनी तालुक्यातील २५ गावे व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रदुषीत झाले आहे. येथील लोकांना विषमज्वर, कावीळ आदी आजारांची नेहमी लागण होत असते. काठावरील गावाजवळ डासांची मोठ्या प्रामणात या प्रदुषीत पाण्यामुळे निर्मीती झाली आहे. त्यामुळे मलेरीया, विषाणुजन्य ताप, डेंगू सदृष ताप आदींशी येथील जनतेला नेहमी सामना करावा लागतो.या प्रदुषीत पाण्याचा फटका भंडारा शहर, पवनी शहर व अनेक गावांना बसत आहे. हे प्रदुषीत पाणी नाईलाजाने येथील जनतेला प्यावे लागत आहे. नागनदीचे प्रदुषण थांबवीण्याकरीता नागपूर महानगर पालीकेने केंद्र सरकार कडे पाठवीलेला १३२८ कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर ही झाला. पण अजुनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे नागनदीचे प्रदुषण कमी झालेले नाही व उलट वाढलेले आहे.विद्यमान परिस्थितीत पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, यात शंका नाही. दिवसेंगणिक पाण्याची पातळी कमी होत असताना जीवनदायीनी नद्यांचे पाणीही दूषित झाले आहे. ही मानवासह जलचरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याचे नमुने निरीनेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यात आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरतील, असे तत्व आढळले होते. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागनदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण अभ्यासक