शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

नागनदीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांना प्रदूषित पाण्याचा फटका । गोसेखुर्दमधील नागनदीचे प्रदूषण कायम बंद व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये शहरातील ३४५ ते ३६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जाते. हे सांडपाणी नागनदी सोबत अन्य चार नद्यांसोबत आंभोरा येथे वैनगंगा नदीला मिळते. हे प्रदूषीत झालेले वैनगंगा नदीचे पाणी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणात जमा होते.नागनदीच्या प्रवाहामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित झालेले पाणी दूरपर्यंत, भंडारा शहरापर्यंतपसरले आहे. पवनी तालुक्यातील २५ गावे व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रदुषीत झाले आहे. येथील लोकांना विषमज्वर, कावीळ आदी आजारांची नेहमी लागण होत असते. काठावरील गावाजवळ डासांची मोठ्या प्रामणात या प्रदुषीत पाण्यामुळे निर्मीती झाली आहे. त्यामुळे मलेरीया, विषाणुजन्य ताप, डेंगू सदृष ताप आदींशी येथील जनतेला नेहमी सामना करावा लागतो.या प्रदुषीत पाण्याचा फटका भंडारा शहर, पवनी शहर व अनेक गावांना बसत आहे. हे प्रदुषीत पाणी नाईलाजाने येथील जनतेला प्यावे लागत आहे. नागनदीचे प्रदुषण थांबवीण्याकरीता नागपूर महानगर पालीकेने केंद्र सरकार कडे पाठवीलेला १३२८ कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर ही झाला. पण अजुनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे नागनदीचे प्रदुषण कमी झालेले नाही व उलट वाढलेले आहे.विद्यमान परिस्थितीत पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, यात शंका नाही. दिवसेंगणिक पाण्याची पातळी कमी होत असताना जीवनदायीनी नद्यांचे पाणीही दूषित झाले आहे. ही मानवासह जलचरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याचे नमुने निरीनेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यात आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरतील, असे तत्व आढळले होते. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागनदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण अभ्यासक