शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

सत्तेच्या माध्यमातून गावाच्या विकासाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:18 IST

लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे आवाहन : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे. चौदाव्या वित्त आयोगात ग्रामसभेला अमर्याद अधिकार प्रदान करण्यात आले आहे. सरपंचपदाची मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत सर्वांना विश्वासात घेऊन सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.आदिवासी विकास विभाग एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आयोजित सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, विवेक नागभिरे, प्रभुदास सोयाम, दिनेश शेराम, श्याम कार्लेकर, अशोक उईके, बिसन सयाम, डॉ.श्याम वरखडे व जगदीश मडावी उपस्थित होते.यावेळी पटोले म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात ६७ गावात आदिवासी सरपंच तर १३० ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. लोकांनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. पदाच्या माध्यमातून विकास हा उद्देश डोळयासमोर ठेऊन कामे करा. शासकीेय योजनांचा अभ्यास करून व अंमलबजावणी करा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज ग्रंथालय उभारण्याच्या सूचना त्यांना संबंधित विभागाला केल्या.यावेळी आ.चरण वाघमारे म्हणाले, गावाच्या विकासाची जबाबदारी व संधी आपल्याला आहे. गावाच्या योजना व अर्थसंकल्प समजून घ्या. कायदे व अधिकार जाणून घ्या. ग्रामसभा कशी चालवायची याबाबत अभ्यास करा. योजनेचा निधी व ग्रामसभेचा ठराव याबाबत जागृत राहा. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घ्या. शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार सरपंचामार्फत व्हावा. सरपंचांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत योजनांची अंमलबजाणी करावी.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शिका, शहाणे व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग लोक कायार्साठी करा, असा सल्ला दिला. गावात रोजगाराची संधी कशा निर्माण होतील या अनुषंगाने सरपंचांनी काम करावे. पुढील काळ हा कौशल्य विकासाचा असून तरूण आणि महिलांच्या हाताला काम देण्याचे दायित्व गावाचा कारभारी म्हणून सरपंचावर आहे. लोकांच्या अडचणी समजून काम करावे, असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, मिळालेल्या गावसेवेच्या संधीचे सोने करा. सरपंचांनी अधिकाराचा योग्य वापर केल्यास गावाचे नंदनवन करण्याची संधी आहे. जिल्हा परिषदमार्फत सरपंचांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे सांगितले.या कार्यक्रमात सरपंचांना योजनांची माहिती पुस्तिका देण्यात आली. डॉ.श्रीकांत गोडबोले व संशोधन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी आदिवासी विभागाच्या विविध योजना, सरपंचाचे अधिकार, अंमलबजावणीची कार्यपध्दती याबाबत सरपंचांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, शासन आणि लोकांमधील महत्त्वाचा दुवा सरपंच आहे. त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला जिल्ह्यातील आदिवासी प्रवर्गातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य व आदिवासी बांधव उपस्थित होते.