शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या माध्यमातून गावाच्या विकासाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:18 IST

लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे आवाहन : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे. चौदाव्या वित्त आयोगात ग्रामसभेला अमर्याद अधिकार प्रदान करण्यात आले आहे. सरपंचपदाची मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत सर्वांना विश्वासात घेऊन सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.आदिवासी विकास विभाग एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आयोजित सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, विवेक नागभिरे, प्रभुदास सोयाम, दिनेश शेराम, श्याम कार्लेकर, अशोक उईके, बिसन सयाम, डॉ.श्याम वरखडे व जगदीश मडावी उपस्थित होते.यावेळी पटोले म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात ६७ गावात आदिवासी सरपंच तर १३० ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. लोकांनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. पदाच्या माध्यमातून विकास हा उद्देश डोळयासमोर ठेऊन कामे करा. शासकीेय योजनांचा अभ्यास करून व अंमलबजावणी करा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज ग्रंथालय उभारण्याच्या सूचना त्यांना संबंधित विभागाला केल्या.यावेळी आ.चरण वाघमारे म्हणाले, गावाच्या विकासाची जबाबदारी व संधी आपल्याला आहे. गावाच्या योजना व अर्थसंकल्प समजून घ्या. कायदे व अधिकार जाणून घ्या. ग्रामसभा कशी चालवायची याबाबत अभ्यास करा. योजनेचा निधी व ग्रामसभेचा ठराव याबाबत जागृत राहा. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घ्या. शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार सरपंचामार्फत व्हावा. सरपंचांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत योजनांची अंमलबजाणी करावी.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शिका, शहाणे व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग लोक कायार्साठी करा, असा सल्ला दिला. गावात रोजगाराची संधी कशा निर्माण होतील या अनुषंगाने सरपंचांनी काम करावे. पुढील काळ हा कौशल्य विकासाचा असून तरूण आणि महिलांच्या हाताला काम देण्याचे दायित्व गावाचा कारभारी म्हणून सरपंचावर आहे. लोकांच्या अडचणी समजून काम करावे, असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, मिळालेल्या गावसेवेच्या संधीचे सोने करा. सरपंचांनी अधिकाराचा योग्य वापर केल्यास गावाचे नंदनवन करण्याची संधी आहे. जिल्हा परिषदमार्फत सरपंचांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे सांगितले.या कार्यक्रमात सरपंचांना योजनांची माहिती पुस्तिका देण्यात आली. डॉ.श्रीकांत गोडबोले व संशोधन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी आदिवासी विभागाच्या विविध योजना, सरपंचाचे अधिकार, अंमलबजावणीची कार्यपध्दती याबाबत सरपंचांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, शासन आणि लोकांमधील महत्त्वाचा दुवा सरपंच आहे. त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला जिल्ह्यातील आदिवासी प्रवर्गातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य व आदिवासी बांधव उपस्थित होते.