शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

आराखडा तातडीने तयार करा

By admin | Updated: November 11, 2015 00:31 IST

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे.

पालकमंत्र्याचे निर्देश : पर्यटनस्थळांचा विकास व स्थानिकांना रोजगारगोंदिया :जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची विकास कामे वेळीच व नियोजनबद्ध रितीने करण्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत जिल्हा पर्यटन समितीच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शर्मा, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासाठी भरपूर संधी आहे. जास्तीत जास्त पर्यटक नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. परंतु आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटक येण्यासाठी आता चांगल्या प्रकारचे कालबद्ध नियोजन करून जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे दर्जेदार व वेळीच झाली पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने प्रतापगड येथे येतात. तेथे भाविकांसाठी यात्रेच्या काळात पिण्याच्या पाण्याची सुविधा होईल, याकडे लक्ष द्यावे. कचारगड हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा व पायऱ्या बांधण्याची कामे तातडीने पूर्ण करावे. सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना तेथे आकर्षित करून स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देता येईल, याची चाचपणी करावी. नागझिरा अभयारण्यात पर्यटकांच्या सेवेकरिता असलेल्या टाटा पिक अप वाहनांची स्थितीसुद्धा पालकमंत्र्यांनी या वेळी जाणूण घेतली.जिल्ह्यातील ११ पर्यटन स्थळांच्या विकासाचा ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दिल्याचे घाटे यांनी सांगितले. तसेच विविध विभागाकडून पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिली. (प्रतिनिधी)