शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा तातडीने तयार करा

By admin | Updated: November 11, 2015 00:31 IST

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे.

पालकमंत्र्याचे निर्देश : पर्यटनस्थळांचा विकास व स्थानिकांना रोजगारगोंदिया :जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची विकास कामे वेळीच व नियोजनबद्ध रितीने करण्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत जिल्हा पर्यटन समितीच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शर्मा, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासाठी भरपूर संधी आहे. जास्तीत जास्त पर्यटक नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. परंतु आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटक येण्यासाठी आता चांगल्या प्रकारचे कालबद्ध नियोजन करून जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे दर्जेदार व वेळीच झाली पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने प्रतापगड येथे येतात. तेथे भाविकांसाठी यात्रेच्या काळात पिण्याच्या पाण्याची सुविधा होईल, याकडे लक्ष द्यावे. कचारगड हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा व पायऱ्या बांधण्याची कामे तातडीने पूर्ण करावे. सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना तेथे आकर्षित करून स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देता येईल, याची चाचपणी करावी. नागझिरा अभयारण्यात पर्यटकांच्या सेवेकरिता असलेल्या टाटा पिक अप वाहनांची स्थितीसुद्धा पालकमंत्र्यांनी या वेळी जाणूण घेतली.जिल्ह्यातील ११ पर्यटन स्थळांच्या विकासाचा ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दिल्याचे घाटे यांनी सांगितले. तसेच विविध विभागाकडून पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिली. (प्रतिनिधी)