शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

काँग्रेससाठी आव्हान भाजपसाठी प्रतिष्ठेची

By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा

काँग्रेस गटातटात : भाजपमध्ये धुसफूस मोहन भोयर - तुमसरलोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा आणि जातीय समीकरण साधून कुणाला उमेदवारी देते, यावर समोरचे चित्र अवलंबून राहणार आहे.तुमसर विधानसभा क्षेत्र कुणबी, तेली, पोवार, अनुसूचित जाती व जमाती असे सामाजिक दृष्ट्या संमिश्र आहे. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला असला तरी १९९0 मध्ये भाजपने खिंडार पाडले. त्यानंतर सलग तीनवेळा भाजपने ही जागा जिंकली. २00९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी अनिल बावनकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्यांनी सहा हजार मतांनी ही जागा जिंकली. या निवडणुकीत तिनवेळा विजयी झालेले भाजपचे मधुकर कुकडे यांना ५९ हजार ७५0 तर अपक्ष चरण वाघमारे यांना ३६ हजार ७५0 मते मिळाली होती. अनिल बावनकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे तेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे.   त्यांना शह देण्यासाठी यावेळी भाजपमध्ये समाजाभिमुख चेहरा आणि सामाजिकदृष्ट्या सर्वांना चालणारा अशा उमेदवाराच्या शोधात आहे. असे असले तरी भाजपकडून तिकीट मागणार्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे तिकीटसाठी लॉबिंग करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले या दोघांच्याही मर्जीतील असणे आवश्यक आहे. यातही निष्ठावंत, समाजाभिमुख या घडामोडीत श्रेष्ठींची मर्जी कुणावर बहाल होते, हे पाहणे उत्सुक्तेचे ठरणार आहे.भंडारा लोकसभा क्षेत्रात आघाडीला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आणि या विधानसभा क्षेत्रात युतीला २३ हजारांची आघाडी मिळाल्यामुळे भाजपचे मनोबल उंचावले आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात भाजपचे संघटन मजबूत असले तरी अंतर्गत धुसफूस अधिक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतला तर काँग्रेसला हा मतदारसंघ राखता येऊ शकतो. परंतु काँग्रेस पक्ष गटतटात विखुरला असल्यामुळे सर्वांना सोबत कसे घेता येऊ शकते, यावर खलबते सुरू आहेत.भाजपात बंडखोरीची शक्यतालोकसभा निवडणुकीमुळे मनोबल उंचावलेल्या भाजपामध्ये पुढची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा अनेकांचा दावा आहे. त्यामुळे दुखावलेले इच्छूक बंडखोरी करू शकतात, असे चित्र आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले राजेंद्र पटले यांनी मागील काही वर्षांपासून किसान गर्जना नावाची संघटना स्थापन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. ते पोवार या बहुसंख्य समाजाचे असल्यामुळे जातीय समीकरणाचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.