शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससाठी आव्हान भाजपसाठी प्रतिष्ठेची

By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा

काँग्रेस गटातटात : भाजपमध्ये धुसफूस मोहन भोयर - तुमसरलोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा आणि जातीय समीकरण साधून कुणाला उमेदवारी देते, यावर समोरचे चित्र अवलंबून राहणार आहे.तुमसर विधानसभा क्षेत्र कुणबी, तेली, पोवार, अनुसूचित जाती व जमाती असे सामाजिक दृष्ट्या संमिश्र आहे. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला असला तरी १९९0 मध्ये भाजपने खिंडार पाडले. त्यानंतर सलग तीनवेळा भाजपने ही जागा जिंकली. २00९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी अनिल बावनकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्यांनी सहा हजार मतांनी ही जागा जिंकली. या निवडणुकीत तिनवेळा विजयी झालेले भाजपचे मधुकर कुकडे यांना ५९ हजार ७५0 तर अपक्ष चरण वाघमारे यांना ३६ हजार ७५0 मते मिळाली होती. अनिल बावनकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे तेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे.   त्यांना शह देण्यासाठी यावेळी भाजपमध्ये समाजाभिमुख चेहरा आणि सामाजिकदृष्ट्या सर्वांना चालणारा अशा उमेदवाराच्या शोधात आहे. असे असले तरी भाजपकडून तिकीट मागणार्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे तिकीटसाठी लॉबिंग करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले या दोघांच्याही मर्जीतील असणे आवश्यक आहे. यातही निष्ठावंत, समाजाभिमुख या घडामोडीत श्रेष्ठींची मर्जी कुणावर बहाल होते, हे पाहणे उत्सुक्तेचे ठरणार आहे.भंडारा लोकसभा क्षेत्रात आघाडीला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आणि या विधानसभा क्षेत्रात युतीला २३ हजारांची आघाडी मिळाल्यामुळे भाजपचे मनोबल उंचावले आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात भाजपचे संघटन मजबूत असले तरी अंतर्गत धुसफूस अधिक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतला तर काँग्रेसला हा मतदारसंघ राखता येऊ शकतो. परंतु काँग्रेस पक्ष गटतटात विखुरला असल्यामुळे सर्वांना सोबत कसे घेता येऊ शकते, यावर खलबते सुरू आहेत.भाजपात बंडखोरीची शक्यतालोकसभा निवडणुकीमुळे मनोबल उंचावलेल्या भाजपामध्ये पुढची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा अनेकांचा दावा आहे. त्यामुळे दुखावलेले इच्छूक बंडखोरी करू शकतात, असे चित्र आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले राजेंद्र पटले यांनी मागील काही वर्षांपासून किसान गर्जना नावाची संघटना स्थापन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. ते पोवार या बहुसंख्य समाजाचे असल्यामुळे जातीय समीकरणाचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.