शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

प्रेमाचा सल्ला नव्हे उत्साहींना हवा ‘प्रसाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर मोठी गर्दी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘रस्त्यावर फिरू नका, घरातच बसा’ असा प्रेमाचा सल्ला प्रशासन आणि पोलीस वारंवार देत आहेत. मात्र भंडारातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घ्यायलाच तयार नाही. उत्साही मंडळी लॉकडाऊन पहायला रस्त्यावर निघत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता असून अशा उत्साहींना प्रेमाचा सल्ला नव्हे तर पोलिसांचा प्रसादच हवा आहे, अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे असे वारंवार सांगितले जात आहे. कोरोनाचा प्रसार विदेशात झपाट्याने होत असताना आपल्या देशातही संसर्गाची भीती कायम आहे. मात्र कुणीही त्याला गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचे भंडारा शहरात दिसत आहे. सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.नागरिकांच्या सोयीसाठी शहरात सात ठिकाणी भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या भाजीबाजारातही नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अतिशय अनियंत्रित वातावरणात नागरिक वावरत आहेत. कुणाच्याही तोंडाला मास्क नसतात. काहीतर केवळ भाजीचे भाव विचारण्यासाठी येत असल्याचे चित्र राजीव गांधी चौकातील गणेश विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या बाजारात सोमवारी दिसत होते.घरात राहायची कुणालाही सवय नाही. मात्र कोरोनाचे संकट केवळ घरात राहूनच थांबणार आहे. परंतु काही उत्साहींना तेवढाही धीर दिसत नाही. रस्त्यावर फिरताना अनेक जण दिसून येतात. पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर बॅरिकेटस् लावले आहेत. परंतु चोरवाटा माहित असल्याने त्यावरुन ही मंडळी बिनबोभाटपणे फिरताना दिसून येतात. काही जण तर चहा आणि खºर्याच्या शोधात भटकत असल्याचे दिसतात. अशा अतिउत्साही नागरिकांना पोलीस सध्यातरी केवळ प्रेमाचा सल्ला देत आहेत. मात्र आता नागरिकांना घरात बसवायचे असेल तर पोलिसी प्रसादाशिवाय शक्य नाही. उत्साहींना कितीही प्रेमाने सांगितले तरी घरात बसण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे अशा तरुणांना पोलीसी प्रसादासोबतच दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. कुणी रस्त्यावर भटकताना दिसला की त्याचे पोलिसांनी चालान फाडावे हा संदेश एकदा शहरभर गेला की मग कुणी रस्त्यावर यायची हिंमत करणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या