शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

प्रेमाचा सल्ला नव्हे उत्साहींना हवा ‘प्रसाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर मोठी गर्दी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘रस्त्यावर फिरू नका, घरातच बसा’ असा प्रेमाचा सल्ला प्रशासन आणि पोलीस वारंवार देत आहेत. मात्र भंडारातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घ्यायलाच तयार नाही. उत्साही मंडळी लॉकडाऊन पहायला रस्त्यावर निघत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता असून अशा उत्साहींना प्रेमाचा सल्ला नव्हे तर पोलिसांचा प्रसादच हवा आहे, अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे असे वारंवार सांगितले जात आहे. कोरोनाचा प्रसार विदेशात झपाट्याने होत असताना आपल्या देशातही संसर्गाची भीती कायम आहे. मात्र कुणीही त्याला गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचे भंडारा शहरात दिसत आहे. सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.नागरिकांच्या सोयीसाठी शहरात सात ठिकाणी भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या भाजीबाजारातही नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अतिशय अनियंत्रित वातावरणात नागरिक वावरत आहेत. कुणाच्याही तोंडाला मास्क नसतात. काहीतर केवळ भाजीचे भाव विचारण्यासाठी येत असल्याचे चित्र राजीव गांधी चौकातील गणेश विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या बाजारात सोमवारी दिसत होते.घरात राहायची कुणालाही सवय नाही. मात्र कोरोनाचे संकट केवळ घरात राहूनच थांबणार आहे. परंतु काही उत्साहींना तेवढाही धीर दिसत नाही. रस्त्यावर फिरताना अनेक जण दिसून येतात. पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर बॅरिकेटस् लावले आहेत. परंतु चोरवाटा माहित असल्याने त्यावरुन ही मंडळी बिनबोभाटपणे फिरताना दिसून येतात. काही जण तर चहा आणि खºर्याच्या शोधात भटकत असल्याचे दिसतात. अशा अतिउत्साही नागरिकांना पोलीस सध्यातरी केवळ प्रेमाचा सल्ला देत आहेत. मात्र आता नागरिकांना घरात बसवायचे असेल तर पोलिसी प्रसादाशिवाय शक्य नाही. उत्साहींना कितीही प्रेमाने सांगितले तरी घरात बसण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे अशा तरुणांना पोलीसी प्रसादासोबतच दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. कुणी रस्त्यावर भटकताना दिसला की त्याचे पोलिसांनी चालान फाडावे हा संदेश एकदा शहरभर गेला की मग कुणी रस्त्यावर यायची हिंमत करणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या