शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना गुंडाळणार

By admin | Updated: October 5, 2015 01:01 IST

तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली.

विकास कामे थंडबस्त्यात : जिल्ह्याला केवळ १० टक्केच निधी प्राप्तराहुल भुतांगे तुमसर तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली. मात्र, नोव्हेंबर २०१४ पासून शासनाने निधीच देणे बंद केल्याने ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरु केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० लोकसंख्येवरील ग्रामीण भागातील गावांना जे मुख्य रस्त्याला न जोडलेली अशी गावे जोडणे, त्या पाठोपाठ ५०० ते १००० लोकसंख्या असलेली गावे मुख्य व मजबूत रस्त्याला जोडणे, असा कार्यक्रम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत राबविण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गावे मुख्य रस्त्याला जोडली गेल्याने विकसीत झाली. यासाठी केंद्र शासनाने निधीही उपलब्ध करून दिला. साधारणपणे या उपक्रमामुळे सन २००६ पर्यंत अनेक खेड्यांची जोडणी पूर्णत्वास आली. या योजनेत टप्पा क्र. २ मध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया या माध्यमातून शासनाने राबविली. यामध्ये रस्त्याची कामेही समाधानकारक करण्यात आली. दरम्यान सन २०१० मध्ये या योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्यावरील पुलाची कामे हाती घेण्यात आली. सदर योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत सुरळीत सुरु होती. परंतु, आता केंद्रात सत्ता बदल होताच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांना केंद्र सरकारने अल्पशा निधी दिला आहे. यामुळे काही टक्केच निधी राज्याला प्राप्त झाल्याने त्या निधीतून जिल्ह्याच्या वाट्याला १० टक्केच निधी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त निधीत कंत्राटदाराचेही पैसे मिळणे कठीण असल्यामुळे काही कंत्राटदारांनी तर अर्धवट कामे पूर्ण करून कामे सोडले आहेत. एकीकडे केंद्र सरकार तिजोरी खाली असल्याचे तुणतुणे वाजवित असली तरी विदेशांना दिलेल्या देणग्या कुठल्या? असा संतप्त सवाल संबंधित कंत्राटदारांनी केला आहे. केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१४ पासून एक छदामही निधी दिला नाही, व सप्टेंबर महिन्यात केवळ १० टक्केच निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यामुळे कोणत्या कंत्राटदारांना त्यांच्या कामाची बिल द्यावे व कोणला नाही, या विवंचनेत योजना अधिकारी व अभियंते सापडले आहेत. आता व भविष्यात मंजूर कामाचे काय होणार? हे सांगणे जरा कठीणच असले तरी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गुंडाळल्यात जमा आहे.