शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना गुंडाळणार

By admin | Updated: October 5, 2015 01:01 IST

तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली.

विकास कामे थंडबस्त्यात : जिल्ह्याला केवळ १० टक्केच निधी प्राप्तराहुल भुतांगे तुमसर तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली. मात्र, नोव्हेंबर २०१४ पासून शासनाने निधीच देणे बंद केल्याने ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.सन २००१ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरु केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० लोकसंख्येवरील ग्रामीण भागातील गावांना जे मुख्य रस्त्याला न जोडलेली अशी गावे जोडणे, त्या पाठोपाठ ५०० ते १००० लोकसंख्या असलेली गावे मुख्य व मजबूत रस्त्याला जोडणे, असा कार्यक्रम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत राबविण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गावे मुख्य रस्त्याला जोडली गेल्याने विकसीत झाली. यासाठी केंद्र शासनाने निधीही उपलब्ध करून दिला. साधारणपणे या उपक्रमामुळे सन २००६ पर्यंत अनेक खेड्यांची जोडणी पूर्णत्वास आली. या योजनेत टप्पा क्र. २ मध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया या माध्यमातून शासनाने राबविली. यामध्ये रस्त्याची कामेही समाधानकारक करण्यात आली. दरम्यान सन २०१० मध्ये या योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्यावरील पुलाची कामे हाती घेण्यात आली. सदर योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत सुरळीत सुरु होती. परंतु, आता केंद्रात सत्ता बदल होताच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांना केंद्र सरकारने अल्पशा निधी दिला आहे. यामुळे काही टक्केच निधी राज्याला प्राप्त झाल्याने त्या निधीतून जिल्ह्याच्या वाट्याला १० टक्केच निधी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त निधीत कंत्राटदाराचेही पैसे मिळणे कठीण असल्यामुळे काही कंत्राटदारांनी तर अर्धवट कामे पूर्ण करून कामे सोडले आहेत. एकीकडे केंद्र सरकार तिजोरी खाली असल्याचे तुणतुणे वाजवित असली तरी विदेशांना दिलेल्या देणग्या कुठल्या? असा संतप्त सवाल संबंधित कंत्राटदारांनी केला आहे. केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१४ पासून एक छदामही निधी दिला नाही, व सप्टेंबर महिन्यात केवळ १० टक्केच निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यामुळे कोणत्या कंत्राटदारांना त्यांच्या कामाची बिल द्यावे व कोणला नाही, या विवंचनेत योजना अधिकारी व अभियंते सापडले आहेत. आता व भविष्यात मंजूर कामाचे काय होणार? हे सांगणे जरा कठीणच असले तरी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गुंडाळल्यात जमा आहे.