शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

संगम येथे विजेचा लपंडाव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

फोटो ०९ लोक०२,०३ के भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा ...

फोटो ०९ लोक०२,०३ के

भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता, कर्मचारी नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी संपर्क झालाच तर दुसऱ्याही गावाची वीज खंडित आहे. तुमचे एकच गाव आहे का? वाट पहा! अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

भंडारा शहरालगत संगम पुनर्वसन हे गोसे प्रकल्पबाधित गाव आहे. येथील विद्युत यंत्रणा पूर्णतः खिळखिळी झाली असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले असून, जिवंत तारा लोंबकळत आहेत, याशिवाय विद्युत रोहित्रही खुले असून, पूर्णतः फुटलेले आहे. त्यामुळे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने विजेच्या ठिणग्या पडून गावातील वीजपुरवठा रोजच खंडित होत असून, ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

जनमित्राला संपर्क केल्यास ते नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी-कधी थातुरमातूर जोड जंतर करतात. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, गावातील वीजपुरवठा सुरळीत करून फुटलेले रोहित्र तसेच लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांबांची पुनर्बांधणी करून बंद असलेले पथदिवे सुरु करण्याबाबत कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, या निवेदनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. अशातच ८ मे रोजी ५.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संगम येथील अगोदरच खिळखिळी असलेली विद्युत यंत्रणा यामुळे कोसळली असून, जिवंत विद्युत तारा व विजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा शनिवारपासून अद्यापपर्यंत बंद आहे. जनमित्रांशी संपर्क केला असता. नेहमीप्रमाणे ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

एकीकडे कोरोना महामारीने नागरिकांचे जगणे मुश्कील केले तर दुसरीकडे भरमसाठ येणाऱ्या विद्युत बिलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच हाताला काम नसल्याने अनेकांचे रोजगार गेले असून, हातावर पोट असणाऱ्यांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संगम येथील ग्रामस्थ विजेच्या रोजच्या त्रासाला कंटाळले असून, जिवंत विद्युत तारा, वाकलेले खांब व फुटलेल्या रोहित्रामुळे गावात जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रतिक्रिया:-

शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मंडलामधील बहुतांश गावांमधील विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

चापेकर, कनिष्ठ अभियंता, शहापूर मंडल.