शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

संगम येथे विजेचा लपंडाव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

फोटो ०९ लोक०२,०३ के भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा ...

फोटो ०९ लोक०२,०३ के

भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता, कर्मचारी नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी संपर्क झालाच तर दुसऱ्याही गावाची वीज खंडित आहे. तुमचे एकच गाव आहे का? वाट पहा! अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

भंडारा शहरालगत संगम पुनर्वसन हे गोसे प्रकल्पबाधित गाव आहे. येथील विद्युत यंत्रणा पूर्णतः खिळखिळी झाली असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले असून, जिवंत तारा लोंबकळत आहेत, याशिवाय विद्युत रोहित्रही खुले असून, पूर्णतः फुटलेले आहे. त्यामुळे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने विजेच्या ठिणग्या पडून गावातील वीजपुरवठा रोजच खंडित होत असून, ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

जनमित्राला संपर्क केल्यास ते नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी-कधी थातुरमातूर जोड जंतर करतात. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, गावातील वीजपुरवठा सुरळीत करून फुटलेले रोहित्र तसेच लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांबांची पुनर्बांधणी करून बंद असलेले पथदिवे सुरु करण्याबाबत कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, या निवेदनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. अशातच ८ मे रोजी ५.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संगम येथील अगोदरच खिळखिळी असलेली विद्युत यंत्रणा यामुळे कोसळली असून, जिवंत विद्युत तारा व विजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा शनिवारपासून अद्यापपर्यंत बंद आहे. जनमित्रांशी संपर्क केला असता. नेहमीप्रमाणे ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

एकीकडे कोरोना महामारीने नागरिकांचे जगणे मुश्कील केले तर दुसरीकडे भरमसाठ येणाऱ्या विद्युत बिलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच हाताला काम नसल्याने अनेकांचे रोजगार गेले असून, हातावर पोट असणाऱ्यांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संगम येथील ग्रामस्थ विजेच्या रोजच्या त्रासाला कंटाळले असून, जिवंत विद्युत तारा, वाकलेले खांब व फुटलेल्या रोहित्रामुळे गावात जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रतिक्रिया:-

शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मंडलामधील बहुतांश गावांमधील विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

चापेकर, कनिष्ठ अभियंता, शहापूर मंडल.