शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

गोबरवाही पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST

तुमसर : गोबरवाही पाणीपुरवठा योजनेवर सहा लाखांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गोबरवाही ग्रामीण विभागीय पाणीपुरवठा योजनेची वीज वितरण कंपनीने ...

तुमसर : गोबरवाही पाणीपुरवठा योजनेवर सहा लाखांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गोबरवाही ग्रामीण विभागीय पाणीपुरवठा योजनेची वीज वितरण कंपनीने सोमवारी वीज खंडित केली. त्यामुळे आठ गावातील सुमारे आठ हजार नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागणार असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गोबरवाही ग्रामीण विभागीय पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आठ गावे येतात. यात गोबरवाही, नाकाडोंगरी, राजापूर, चिखला, सीता सावंगी, सुंदरटोला, गणेशपूर टोली, हेटीटोला या गावांचा समावेश आहे. वीज वितरण कंपनीने सोमवारी सदर पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित केली या योजनेवर सहा लाखाचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. ही योजना भंडारा जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेद्वारे सुरू आहे.

आठ गावातील सुमारे आठ हजार नागरिकांना नाइलाजाने विहिरींचे अनेक दिवसाचे साचलेले पाणी प्यावे लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे नागरिकात तीव्र असंतोष आहे. जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आली त्यामुळे लोकप्रतिनिधी येथे हतबल आहेत. सदर समस्येवर आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जल जीवन आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ रद्द करण्याची गरज आहे.