शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

विद्युत कंपनीने उगारला वीज खंडितचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल ...

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या नोटिसांमुळे लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफीची आशा मावळली असून, जनतेत शासनाविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे.

कोरोना संकटामुळे अपरिहार्य ठरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. परिणामी शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत अशा अनेक सुविधा दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर शासन लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करील, अशी जनतेची रास्त अपेक्षा होती. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकत्याच बजावलेल्या नोटिसांमुळे जनतेची आशा धुळीस मिळाली. अनेक वीज ग्राहकांकडे मार्च २० पासूनची बिले थकीत आहेत. विद्युत वितरण कंपनीने दर महिन्याच्या थकीत बिलावर व्याज आकारल्यामुळे या बिलांची रक्कम आणखी फुगली आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी झाली असली तरी त्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत; तर अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत खरेदी केंद्रावर पडून आहे. अशा परिस्थितीत एवढे मोठे बिल एकाच वेळी कसे भरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, शासनाने किमान लाॅकडाऊनच्या काळातील तीन-चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी जनतेची मागणी आहे. विरली (बु.) वीज वितरण केंद्रांतर्गत परिसरातील २३ गावे येतात. ज्या ग्राहकांकडे पाच हजार वा त्यापेक्षा अधिक वीज बिल थकीत आहे, अशा सुमारे ५०० ग्राहकांना नोटीस बजावण्यात आली आहे.