शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निसर्गासह वीज कंपनीही कोपली

By admin | Updated: July 9, 2015 00:37 IST

निसर्गाने हुलकावणी दिली असतानाच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे.

दोन डीपी बंद : शेतशिवारात विजेचा तुटवडा, पीक करपू लागले, आर्थिक संकटनितेश किरणापुरे लवारीनिसर्गाने हुलकावणी दिली असतानाच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. दोन डीपी बंद अवस्थेत असल्याने पिकांना सिंचन करून वाचविण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे. यामुळे तो पुरता हतबल झाला आहे. जांभुळघाट परिसरातील डी.पी. ही गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेली आहे. काही ठिकाणाहून विद्युत तारे सुद्धा तुटलेली आहेत. या परिसरातील जवळपास २७ वीज जोडणी आहे. यातून सुमारे ६० एकरात ओलीत करण्यात येते. यासोबतच महिनाभरापासून गूळ फॅक्टरी परिसरातील डी.पी. वरील ट्रान्सफार्मर जळाले आहे. याची नोंद केली असता त्याची दुरूस्ती करण्याकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केलेले आहे. यात २० कनेक्शन बसविले आहेत व ४० ते ४५ एकर शेतीला हे ओलीत करतात. या गोष्टी लक्षात घेता आता भात लागवडीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निसर्ग कोपला असून वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सिंचन होऊ शकत नसल्याने पऱ्हे करपले आहेत. शेतातील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याचे चिन्ह दिसू लागली आहे. अशी परिस्थिती असतांनाही लवारी परिसरात स्थायी लाईनमेन नसल्याने नागरिक पहिलेच त्रस्त आहे. त्याामुळे लवारी परिसरातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी स्थायी लाईनमेन द्यावा व बंद असलेल्या डीपी त्वरीत सुरू करण्याची मागणी आहे.डीपी बंद असल्याबाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी एक डीपी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या डीपीबाबत त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.गुळफॅक्टरी शिवारातील डी.पी. वरील ट्रान्सफार्मर महिनाभरापासून बंद पडलेले आहे. याची तक्रार केली आहे. महावितरण कंपनी या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित झाले आहेत. - जयगोपाल गभणेशेतकरी, लवारी.गेल्या दोन वर्षापासून जांभुळघाट शिवारातील डी.पी. बंद पडलेली आहे व ताराही तुटलेल्या आहेत. याची तक्रार केली आहे. तरी वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही. या परिसरातील शेत पिके धोक्यात आली आहे. - अनिल किरणापुरेउपसरपंच लवारी