शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मृत्यूला आमंत्रण देणारे राज्य मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:21 IST

बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे.

ठळक मुद्देरस्त्याची चाळणी : शासनाचा लाखोंचा पैसा ठरला व्यर्थ

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे.राज्यात खड्डे मुक्तीची शासनाच्या बांधकाम मंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटवून घेतली. खड्यांची मलमपट्टी केली. सुरक्षित रस्ते करण्याचा देवाखा निर्माण केला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्या खड्यांची स्थिती पूर्ववत झाल्याने ही खड्यांची मलमपट्टीच होती हे सिद्ध झाले. पावसाळा सुरू झाला आहे.भंडारा-तुमसर या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहे. वरठीच्या बायपास रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. बोथली-मोहगावच्या भागात रस्त्याला मोठमोठी खड्डे पडली आहेत. या खड्ड्यात पावसाचा पाणी साचून राहतो. खड्डा पाण्याने भरला जातो. परिवहन करताना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे, खड्ड्यात वाहन गेल्यानंतर वाहनधारकांना जीवघेणी अनुभूती येते.राज्य शासनाच्या बांधकाम खात्यानंतर खड्डे बुजवाचा फर्मान आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवाची मोहिम हाती घेतली. घाईघाईने खड्डे बुजविण्याचे काम झाले. काही दिवसाच खड्ड्याची स्थिती तिच झाल्याने खड्ड्यावर मलमपट्टी करण्यासाठी खर्च पाण्यात गेला आहे. जागोजागी पडलेले खड्डे राज्यमार्गावरचे मृत्युचे साफळे तयार झाल्याचे दिसून येते. आता हे पडलेले खड्डे कुणाचे प्राण गेल्यानंतरच बुजविले जातील काय असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.धोकादायक ठिकाणसुर नदीवरचा पुल नव्याने तयार झाला. तथापि, भंडाराकडे जाणारा पुलाच्या काठावरचा भाग अतिशय धोकादायक बनला आहे. पुलाच्या काठावरची माती दबल्या गेली. त्यामुळे तो भाग खोलगट बनला आहे. तुमसरहून मोहाडीकडून येणारी वाहने त्या भागात आदळतात. त्यामुळे प्रसंगी मोठा धोका होण्याची भीती अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली. दररोज या मार्गाने जी वाहन जातात त्यांना त्या भागाची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते वाहनधारक त्या ठिकाणाहून वेग कमी करतात. धोका टाळण्याचा प्रयत्न करतात. पण, नवीन वाहनधारकांना ही जागा जीवघेणी ठरू शकते. एखाद्या मोठ्या प्रसंगाची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे काय असा सवाल निर्माण केला जात आहे. युद्धपातळीवर भंडारा, तुमसर राज्य मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम व मोहगाव देवी येथील सुरनदीवरचा पुलाचा तो धोकादायक भाग तातडीने दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, नरेश ईश्वरकर, काँग्रेसचे गजानन झंझाड यांनी केली आहे.