शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
3
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
4
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
5
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
6
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
7
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
8
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
9
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
10
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
11
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
12
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
13
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
14
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
15
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
16
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
17
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
18
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
19
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
20
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

३७ गावांत संभाव्य पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2016 00:28 IST

यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

साकोली तालुक्यातील गावे : पंचायत समितीत एप्रिल ते जूनपर्यंत उपाययोजनांचा आराखडा तयारसंजय साठवणे साकोली यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात ३७ गावात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. यासाठी प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासन या पाणी टंचाईवर खरोखरच मात करू शकेल काय? पंचायत समिती साकोली अंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी संभाव्य पाणीटंचाई म्हणून ३७ गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विहिरीचे खोलीकरण व गाळ काढणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे यासारख्या सोयींची तरतूद करण्यात आली असून यात बाम्हणी, बांपेवाडा, बरडकिन्ही, बोंडे, बोळदे, सालई, सुंदरी, एकोडी, घानोड, गिरोला, गुढरी, जांभळी सडक, किन्ही मोखे, लवारी, महालगाव, मुंडीपार, पळसगाव सोनका, पळसपाणी, निप्परटोला, परसटोला, परसोडी, पिंडकेपार, साखरा, सेंदूरवाफा, सानगडी, सासरा, सातलवाडा, सावरबंध, शिवणीबांध, सोनपुरी, सुकळी, उमरी, उसगाव, आतेगाव, विर्शी, विहिरगाव व वडद या ३७ गावाचा समावेश आहे. या गावात उपाययोजना आराखडा व तयार करण्यात आला असला तरी मार्च महिना संपत आहे. मात्र तालुक्यातील एकाही गावात कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील ३७ गावांमध्ये उदभवलेल्या पाणीटंचाईवर प्रशासन मात करण्यात यशस्वी होईल काय असा सवाल आहे. जलशुद्धीकरण योजनाही बंदचमोठा गाजावाजा करीत १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार म्हणून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून साकोली येथे जलशुद्धीकरण योजना तयार केली. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही योजनाही मागील दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे साकोलीला जुन्याच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरु आहे.वसुलीचाही फटका पाणीटंचाईवरयावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. एकंदरीत शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आसहे. त्यामुळे पाणीपट्टीकर व घरकर वसुलीत अडसर निर्माण होत आहे. किडे पाणीपट्टीकर वसुल होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विद्युत बिल भरण्यास असमर्थ आहे. त्यामुळे बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडीत करते. याचाही फटका पाणी टंचाईवर बसत आहे.तलाव कोरडेयावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने तालुक्यातील तलाव, बोड्या यात पाण्याचा अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी माणसासहीत जनावरांनाही पिण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.पाण्याची पातळी खोल गेलीयावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे पाणी जमिनीत मुरले नाही तर शेतीसाठी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात व आता उन्हाळी धानपिकासाठी रात्रंदिवस विहीर व बोअरवेल मधून पाण्याचा उपसा करीत आहेत. पाण्याची पातळी घटली असून याचाही फटका नक्कीच पाणीटंचाईवर बसणार आहे. प्रकल्पाचा उपयोग नाहीसाकोली जवळील कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाला २० वर्षापेक्षा अधिक वर्षे लोटली. मात्र या प्रकल्पाचे बरेच काम बाकी असून याही प्रकल्पाचा उपयोग ना शेतीसाठी ना पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे.