शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

३७ गावांत संभाव्य पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2016 00:28 IST

यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

साकोली तालुक्यातील गावे : पंचायत समितीत एप्रिल ते जूनपर्यंत उपाययोजनांचा आराखडा तयारसंजय साठवणे साकोली यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात ३७ गावात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. यासाठी प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासन या पाणी टंचाईवर खरोखरच मात करू शकेल काय? पंचायत समिती साकोली अंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी संभाव्य पाणीटंचाई म्हणून ३७ गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विहिरीचे खोलीकरण व गाळ काढणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे यासारख्या सोयींची तरतूद करण्यात आली असून यात बाम्हणी, बांपेवाडा, बरडकिन्ही, बोंडे, बोळदे, सालई, सुंदरी, एकोडी, घानोड, गिरोला, गुढरी, जांभळी सडक, किन्ही मोखे, लवारी, महालगाव, मुंडीपार, पळसगाव सोनका, पळसपाणी, निप्परटोला, परसटोला, परसोडी, पिंडकेपार, साखरा, सेंदूरवाफा, सानगडी, सासरा, सातलवाडा, सावरबंध, शिवणीबांध, सोनपुरी, सुकळी, उमरी, उसगाव, आतेगाव, विर्शी, विहिरगाव व वडद या ३७ गावाचा समावेश आहे. या गावात उपाययोजना आराखडा व तयार करण्यात आला असला तरी मार्च महिना संपत आहे. मात्र तालुक्यातील एकाही गावात कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील ३७ गावांमध्ये उदभवलेल्या पाणीटंचाईवर प्रशासन मात करण्यात यशस्वी होईल काय असा सवाल आहे. जलशुद्धीकरण योजनाही बंदचमोठा गाजावाजा करीत १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार म्हणून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून साकोली येथे जलशुद्धीकरण योजना तयार केली. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही योजनाही मागील दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे साकोलीला जुन्याच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरु आहे.वसुलीचाही फटका पाणीटंचाईवरयावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. एकंदरीत शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आसहे. त्यामुळे पाणीपट्टीकर व घरकर वसुलीत अडसर निर्माण होत आहे. किडे पाणीपट्टीकर वसुल होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विद्युत बिल भरण्यास असमर्थ आहे. त्यामुळे बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडीत करते. याचाही फटका पाणी टंचाईवर बसत आहे.तलाव कोरडेयावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने तालुक्यातील तलाव, बोड्या यात पाण्याचा अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी माणसासहीत जनावरांनाही पिण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.पाण्याची पातळी खोल गेलीयावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे पाणी जमिनीत मुरले नाही तर शेतीसाठी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात व आता उन्हाळी धानपिकासाठी रात्रंदिवस विहीर व बोअरवेल मधून पाण्याचा उपसा करीत आहेत. पाण्याची पातळी घटली असून याचाही फटका नक्कीच पाणीटंचाईवर बसणार आहे. प्रकल्पाचा उपयोग नाहीसाकोली जवळील कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाला २० वर्षापेक्षा अधिक वर्षे लोटली. मात्र या प्रकल्पाचे बरेच काम बाकी असून याही प्रकल्पाचा उपयोग ना शेतीसाठी ना पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे.