शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. ...

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेता आले नव्हते. त्यामुळे काही निवडक शाळा सोडल्या तर इतर शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तास घेण्यात आलेले नाहीत. असे असले तरीही अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले होते. त्यातच या परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, ही मुदत आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने अनेकांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत.

बॉक्स

असा करावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे, तसेच या वेबसाइटवर वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज उपलब्ध असणार आहेत.

बॉक्स

कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली शिष्यवृत्ती परीक्षा

१) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण विभागाकडून घेतल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे रोजी परीक्षेचा मुहूर्त ठरला आहे.

२) २५ एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे माहिती आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

३) २३ मे रोजी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा ही परीक्षा आणखी पुढे ढकलली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शाळेचे मुख्याध्यापक व पालकांमधून उपस्थित होत आहे.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यात शासनाची शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यामुळे शाळेतून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत व तयारीही झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आम्ही शाळेतर्फे मार्गदर्शन करीत आहोत.

आर. एस. बारई, मुख्याध्यापक.

नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होतो. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसह इतर सर्वच परीक्षांसाठी आम्ही सर्व शिक्षक प्रोत्साहन देतो. यासोबतच परीक्षेची विद्यार्थ्यांची ऑनलाइन तयारीही करून घेत आहोत.

बाळासाहेब मुंडे, सहायक शिक्षक

जिल्हा परिषद शाळा, वरठी.