शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. ...

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेता आले नव्हते. त्यामुळे काही निवडक शाळा सोडल्या तर इतर शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तास घेण्यात आलेले नाहीत. असे असले तरीही अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले होते. त्यातच या परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, ही मुदत आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने अनेकांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत.

बॉक्स

असा करावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे, तसेच या वेबसाइटवर वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज उपलब्ध असणार आहेत.

बॉक्स

कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली शिष्यवृत्ती परीक्षा

१) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण विभागाकडून घेतल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे रोजी परीक्षेचा मुहूर्त ठरला आहे.

२) २५ एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे माहिती आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

३) २३ मे रोजी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा ही परीक्षा आणखी पुढे ढकलली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शाळेचे मुख्याध्यापक व पालकांमधून उपस्थित होत आहे.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यात शासनाची शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यामुळे शाळेतून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत व तयारीही झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आम्ही शाळेतर्फे मार्गदर्शन करीत आहोत.

आर. एस. बारई, मुख्याध्यापक.

नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होतो. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसह इतर सर्वच परीक्षांसाठी आम्ही सर्व शिक्षक प्रोत्साहन देतो. यासोबतच परीक्षेची विद्यार्थ्यांची ऑनलाइन तयारीही करून घेत आहोत.

बाळासाहेब मुंडे, सहायक शिक्षक

जिल्हा परिषद शाळा, वरठी.