शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
3
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
4
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
5
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
6
Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी
7
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
8
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
9
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
10
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
11
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
12
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
13
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
14
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
15
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
16
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
17
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
18
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
19
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
20
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही

तंत्रशुद्ध भात शेतीत नफा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST

तंत्रशुद्ध शेती शेतकऱ्यांना तारक आहे. पारंपरिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देणे अत्यावश्यक आहे. भात शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास खर्च ...

तंत्रशुद्ध शेती शेतकऱ्यांना तारक आहे. पारंपरिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देणे अत्यावश्यक आहे.

भात शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास खर्च कमी होऊन नफा निश्चितच मिळू शकतो,असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी केले.

लाखनी तालुक्याच्या पालांदूर येथे महिला शेती शाळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच ताराचंद निरगुळे, कृषी पर्यवेक्षक मुकुंद खराबे, अशोक जीभकाटे, कृषी सहायक जागेश्वर नाकाडे, मनोहर बावनकुळे, योगेश गजभिये, विद्या गिरेपुंजे, प्रगतशील शेतकरी अनिल चुटे, कृषी मित्र लेकराम निरगुडे उपस्थित होते. पांडेगावकर म्हणाले, भात शेती करताना पेरणीपासून तर कापणीपर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन तंत्रशुद्ध पद्धतीने व्हायला हवे. दिवसेंदिवस शेतीमध्ये तांत्रिक सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक ज्ञानाला नव्या तंत्राची जोड देत आधुनिक शेती करावी. यात जमिनीची मशागत, खताच्या मात्रा, उत्कृष्ट बियाणे, बीजप्रक्रिया, गादीवाफे, किमान २१ दिवसात रोवणी, विशिष्ट अंतरावर लागवड, नत्र,स्फुरद, पालाश यांचे प्रमाण, किडीची ओळख, कीड नियंत्रण, फवारणी, फळबाग योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यांत्रिकी योजना अशा विविध अंगाने शेतीला जोडणी केल्यास निश्चितच शेती नफ्याची व्हायला समस्या उरणार नाही. यावेळी महिलांनी शेती शाळेच्या अनुषंगाने सकारात्मक अनुभव विषद केले. कृषी विभागाने पुरविलेल्या योजना, अभ्यास महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कविता बावनकुळे, स्वाती निरगुडे, सुषमा बावनकुळे, माधुरी रामटेके, प्रियंका बावनकुळे यांनी शेती शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन कृषी सहायक नाकाडे ,प्रास्ताविक कृषी सहायक योगेश गजभिये यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे यांनी मानले.