शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

तंत्रशुद्ध भात शेतीत नफा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST

तंत्रशुद्ध शेती शेतकऱ्यांना तारक आहे. पारंपरिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देणे अत्यावश्यक आहे. भात शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास खर्च ...

तंत्रशुद्ध शेती शेतकऱ्यांना तारक आहे. पारंपरिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देणे अत्यावश्यक आहे.

भात शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास खर्च कमी होऊन नफा निश्चितच मिळू शकतो,असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी केले.

लाखनी तालुक्याच्या पालांदूर येथे महिला शेती शाळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच ताराचंद निरगुळे, कृषी पर्यवेक्षक मुकुंद खराबे, अशोक जीभकाटे, कृषी सहायक जागेश्वर नाकाडे, मनोहर बावनकुळे, योगेश गजभिये, विद्या गिरेपुंजे, प्रगतशील शेतकरी अनिल चुटे, कृषी मित्र लेकराम निरगुडे उपस्थित होते. पांडेगावकर म्हणाले, भात शेती करताना पेरणीपासून तर कापणीपर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन तंत्रशुद्ध पद्धतीने व्हायला हवे. दिवसेंदिवस शेतीमध्ये तांत्रिक सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक ज्ञानाला नव्या तंत्राची जोड देत आधुनिक शेती करावी. यात जमिनीची मशागत, खताच्या मात्रा, उत्कृष्ट बियाणे, बीजप्रक्रिया, गादीवाफे, किमान २१ दिवसात रोवणी, विशिष्ट अंतरावर लागवड, नत्र,स्फुरद, पालाश यांचे प्रमाण, किडीची ओळख, कीड नियंत्रण, फवारणी, फळबाग योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यांत्रिकी योजना अशा विविध अंगाने शेतीला जोडणी केल्यास निश्चितच शेती नफ्याची व्हायला समस्या उरणार नाही. यावेळी महिलांनी शेती शाळेच्या अनुषंगाने सकारात्मक अनुभव विषद केले. कृषी विभागाने पुरविलेल्या योजना, अभ्यास महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कविता बावनकुळे, स्वाती निरगुडे, सुषमा बावनकुळे, माधुरी रामटेके, प्रियंका बावनकुळे यांनी शेती शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन कृषी सहायक नाकाडे ,प्रास्ताविक कृषी सहायक योगेश गजभिये यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे यांनी मानले.