शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता

By admin | Updated: October 18, 2014 01:07 IST

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे

भंडारा : तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच रविवारला मतमोजणीच्या दिवशी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोणतीही निवडणूक म्हटली की, त्याची बेरीज वजाबाकी, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नसते. प्रत्येकच गावात असे काही तज्ज्ञ असतात. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, कुणाची हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकतो, याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पुर्वीपासूनच आकडेमोड करीत असतात. अशा निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरे ठरतात, असे अंदाज खरे ठरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. यापूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर विश्वास असतो. परंतु, यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना या पक्षांनी स्वतंत्ररित्या निवडणुका लढविल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे या पक्षांसह अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठिण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे. तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही मतदार संघामध्ये तिरंगी लढती आहेत. या तिन्ही मतदारसंघात विजयी उमेदवार काठावर निघेल, असे मानले जात आहे. भंडारा जिल्ह्यात कोण कमी आणि कोण अधिक, याचा अंदाज बांधला जात आहे. मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. रविवारला (दि.१९) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य गुप्त वार्ताविभाग यावेळी पहिल्यांदाच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय दिग्गजांची परीक्षा पाहणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)