शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
5
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
6
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
7
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
8
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
9
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
10
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
11
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
12
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
13
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
14
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
15
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
16
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
17
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
18
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
19
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
20
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !

तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता

By admin | Updated: October 18, 2014 01:07 IST

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे

भंडारा : तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच रविवारला मतमोजणीच्या दिवशी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोणतीही निवडणूक म्हटली की, त्याची बेरीज वजाबाकी, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नसते. प्रत्येकच गावात असे काही तज्ज्ञ असतात. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, कुणाची हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकतो, याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पुर्वीपासूनच आकडेमोड करीत असतात. अशा निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरे ठरतात, असे अंदाज खरे ठरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. यापूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर विश्वास असतो. परंतु, यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना या पक्षांनी स्वतंत्ररित्या निवडणुका लढविल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे या पक्षांसह अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठिण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे. तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही मतदार संघामध्ये तिरंगी लढती आहेत. या तिन्ही मतदारसंघात विजयी उमेदवार काठावर निघेल, असे मानले जात आहे. भंडारा जिल्ह्यात कोण कमी आणि कोण अधिक, याचा अंदाज बांधला जात आहे. मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. रविवारला (दि.१९) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य गुप्त वार्ताविभाग यावेळी पहिल्यांदाच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय दिग्गजांची परीक्षा पाहणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)