शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:31 IST

समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे.

ठळक मुद्देदिलीप तलमले : सोशल मीडिया महामित्र उपक्रम

आॅनलाईन लोकमतभंडारा : समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे. मात्र अनेकवेळा समाज माध्यमांचा चुकीच्या पोस्ट शेअर करण्यासाठी वापर होतांना दिसतो. अशा परिस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम राबवून जागृतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. समाज माध्यमांचा वापर सकारात्मकरीत्या करणे काळाची गरज असून समाज माध्यमाच्या सकारात्मक वापरातूनच विवेकी समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मिडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सोशल मिडिया संवाद सत्राचे आयोजन स्टार रोजगार व स्वयंरोजगार संस्था भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषागार अधिकारी अमित मेश्राम, एनआयसीचे डिआयओ संदिप लोखंडे व सतिश ठाकरे यावेळी उपस्थित होते.सोशल मिडियाचा होणार दुरुपयोग टाळण्यासाठी व त्याच्या योग्य उपयोगासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे. याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या संवाद सत्रातील विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होणार आहे. या प्लॉटफॉर्मचा योग्य उपयोग करा व जनतेत जागृती करुन विवेकशिल समाज घडवा, अशा शुभेच्छा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी उपस्थितांना दिल्या.सोशल मिडिया माहितीच्या आदानप्रदानाचे महत्वाचे माध्यम असून तरुण पिढीने सोशल मिडिया काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून चुकीचा संदेश जाणार नाही. ही काळजी घेतल्यास सोशल मिडिया समाजोपयोगी माध्यम ठरेल. सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम सकारात्मक संदेश देणारा असून सोशल मिडिया विषयी जागृती निर्माण करणारा असल्याचे तलमले यांनी सांगितले.या सत्राकरीता जे. एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सुमंत देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता नितीन कारेमोरे, अक्षय वानखेडे, परिविक्षाधिन तहसिलदार सिध्दार्थकुमार मोरे व रोहित भोंगाडे यांनी निरिक्षक व परिक्षक म्हणून काम पाहिले. संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले तर आभार सतिश ठाकरे यांनी मानले.