शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:31 IST

समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे.

ठळक मुद्देदिलीप तलमले : सोशल मीडिया महामित्र उपक्रम

आॅनलाईन लोकमतभंडारा : समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे. मात्र अनेकवेळा समाज माध्यमांचा चुकीच्या पोस्ट शेअर करण्यासाठी वापर होतांना दिसतो. अशा परिस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम राबवून जागृतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. समाज माध्यमांचा वापर सकारात्मकरीत्या करणे काळाची गरज असून समाज माध्यमाच्या सकारात्मक वापरातूनच विवेकी समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मिडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सोशल मिडिया संवाद सत्राचे आयोजन स्टार रोजगार व स्वयंरोजगार संस्था भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषागार अधिकारी अमित मेश्राम, एनआयसीचे डिआयओ संदिप लोखंडे व सतिश ठाकरे यावेळी उपस्थित होते.सोशल मिडियाचा होणार दुरुपयोग टाळण्यासाठी व त्याच्या योग्य उपयोगासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे. याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या संवाद सत्रातील विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होणार आहे. या प्लॉटफॉर्मचा योग्य उपयोग करा व जनतेत जागृती करुन विवेकशिल समाज घडवा, अशा शुभेच्छा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी उपस्थितांना दिल्या.सोशल मिडिया माहितीच्या आदानप्रदानाचे महत्वाचे माध्यम असून तरुण पिढीने सोशल मिडिया काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून चुकीचा संदेश जाणार नाही. ही काळजी घेतल्यास सोशल मिडिया समाजोपयोगी माध्यम ठरेल. सोशल मिडिया महामित्र हा उपक्रम सकारात्मक संदेश देणारा असून सोशल मिडिया विषयी जागृती निर्माण करणारा असल्याचे तलमले यांनी सांगितले.या सत्राकरीता जे. एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सुमंत देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता नितीन कारेमोरे, अक्षय वानखेडे, परिविक्षाधिन तहसिलदार सिध्दार्थकुमार मोरे व रोहित भोंगाडे यांनी निरिक्षक व परिक्षक म्हणून काम पाहिले. संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले तर आभार सतिश ठाकरे यांनी मानले.