शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सकारात्मक विचाराने 'क्राईम' अत्यल्प

By admin | Updated: November 23, 2015 00:43 IST

जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो.

पोलीस पाटलांची सभा: १४ महिन्यात केवळ २४ गुन्ह्यांची नोंदपालांदूर /चौ. : जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो. त्याला संस्कार समाजात मिळाल्यास वाईट मार्गाला जाणार नाही. यातूनच एकनिष्ठ, निर्लोभ, सुसंस्कारी समाजाची निर्मिती होऊन पोलीस विभागाचा ताण कमी होतो. सट्टा, मटका, दारु आदी गुन्ह्यांची मूळ असल्याने प्रत्येकांनी यातून मोकळे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन पालांदूर ठाण्याचे ठाणेदार एच. एम. सय्यद यांनी पोलीस पाटलांचा सभेला केले.पालांदूर ठाण्याला ५४ गावांचा भार असून ३२ सहकाऱ्यांचा मदतीने सरंक्षण कार्य शांतपणे सुरु आहे. किटाळी, मुरमाडी, मांगली, तई गावातील दारु बंदी करुन गावांना शिस्तप्रिय वातावरण मिळण्यास मदत झाली. सट्टा, मटका राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला गुन्हेगारीकडे नेणारी रित बंद करण्यात आली. महिन्याकाठी लाखाच्या घरात मिळणारी अवैध कमाईला झुगारुन पूर्णपणे सट्टा, मटका बंद करण्यात आला. ५४ गावातील प्रभावशाली व्यक्तींनी ठाणेदारांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त केले असून कर्मावर भर देणाऱ्या व्यक्तींचा नेमीच जय होतो हे तंटामुक्त समिती, पोलीस पाटील,महिला सुरक्षा समिती यांच्याशी नियमित संवाद साधून गावातील समस्यांशी चर्चा व्हावी. आपसात असलेले हेवेदावे मोठ्यांच्या पुढाकाराने शांतपणाने सोडविल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होते, राजकारण्यांनी पक्षभेद विसरुन नि:पक्षपणे समाजाला दिशा दिल्यास रामराज्य शक्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.जिवनात केवळ पैश्याला गरजेपेक्षा अधिक महत्व न देता कर्तव्याला श्रेष्ठत्व दिल्यास 'नर का नारायण' होण्यास वेळ लागत नाही. पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती, महिला सुरक्षा समिती यांच्याशी पोलीस विभागाने नियमित सलगी ठेवल्यास मोठे गुन्हे घडणारच नसल्याचे ते बोलले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निराशेतून घडतांना दिसतात, कुटुंबात, समाजात निराशेत आढळणाऱ्या व्यक्तीकडे आपुलकीने सहानिशा करुन त्याच्या दु:खाचे वाटेकरी होत सुख प्रदान केल्यास आत्महत्येचे सत्र नक्कीच कमी होऊ शकते. समाजाला घडविण्याकरिता मोठ्या क्राईमना मुठमाती देण्याकरिता विद्यार्थी वर्गाला सजग करुन आशावादी समाजाची आशा निर्मिती होते. ठाणेदार सय्यद यांनी संताजी महाविद्यालय पालांदूर येथे अश्याच कार्यक्रमाची आखणी करुन कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा-महाविद्यालय चर्चासत्राचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले आहे. पोलीस विभागाच्या चर्चासत्राला परिसरातील पोलीस पाटील बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाकरिता पोलीस हवालदार शेंडे, बाच्छल, नेमाडे आदीनी सहकार्य केले. (वार्ताहर)