शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पंचायत समिती सदस्य ठरले नावापुरते पदाधिकारी !

By admin | Updated: May 13, 2016 00:36 IST

पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली.

लाखांदूर : पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु या समितीच्या पदाधिकाऱ्यांना नाममात्र अधिकार देऊन १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्यात आल्याने सरपंचालाच जादा अधिकार मिळाले आहेत. राज्य शासनाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्यांनी केली आहे.ग्रामीण विकासाच्या निगडित असलेले शेती, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, पाणी, बांधकाम, असे अनेक विषयावर ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या कामाची देखरेख करण्याचे काम पंचायत समिती सदस्याकडे आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत खात्यात जमा केला आहे. शासनाच्या विविध योजना ग्रामपातळीवर राबविण्याकरिता पूर्वी पंचायत समितीमार्फत निधी वर्ग होत होता. विकास कामाची संपूर्ण सूत्रे पंचायत समितीच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत होती. मात्र यात बदल करून सर्व अधिकार ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेला देण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये एखादी योजना राबविण्यासाठी प्रस्ताव थेट जिल्हा परिषदेला पाठविण्यात येते. कामाचा निधी जिल्हा परिषद उपलब्ध करून देते. ग्रामपंचायतीची विविध कामे होत असल्याने सरपंचाचे महत्त्व वाढले आहे. तब्बल आठते दहा गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती सदस्याला कोणताच निधी दिला नसल्यामुळे राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी आता राज्य शासनाकडे निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मासिक सभा व संबंधित गावांचा दौरा करण्यासाठी किलोमीटरच्या अंतराप्रमाणे प्रवासभत्ता देण्यात येते. या मानधनात किती गावाचा दौरा करावा हेच शासनाने ठरवून दिले तर योग्य होईल दौऱ्याकरीता हे प्रवास मानधन किती अपुरे आहेत. हे शासनाच्या लक्षात येऊनही शासनाने कोणतेच पाऊल उचलले नाहीत, असा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला. एकीकडे जिल्हा परिषद सदस्यांना विविध कामाकरिता निधी उपलब्ध शासन करून देते. मग पंचायत समिती सदस्यावर अन्याय का? असा प्रश्नही या सदस्यांनी केला.ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सचिव तथा सचिव गटविकास अधिकारी तर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या नावाने विविध योजनांचे बँकेत खाते असून यातून योजनेसाठी निधी वापरण्यात येते. परंतु पंचायत समिती स्तरावर सभापती किंवा उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या नावाने कोणत्याच बँकेत विकास निधीचे खाते नसल्याचे पंचायत समिती सदस्य अल्का मेश्राम, राजेंद्र ठाकरे यांनी सांगितले. केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असल्यामुळे पंचायत समिती सदस्यांना निधी देण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो, अशी अपेक्षाही सदस्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)