शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
3
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
5
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
6
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
7
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
8
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
9
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
10
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
11
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
12
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
13
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
14
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
15
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
16
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
17
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
18
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
19
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
20
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल

By admin | Updated: September 22, 2015 00:45 IST

श्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की

इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराश्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की गरिब आपआपल्या परिने सर्वंच श्रम करतात. मात्र आजघडीला ‘गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहीे. जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात कामगारांची संख्या असून अद्यापही हजारो कामगारांची नोंद शासनदफ्तरी नाहीे. परिणामी केंद्र तथा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा खऱ्या कामगारांना मिळतो काय? हाच खरा सवाल आहे.भंडारा जिल्ह्यातील उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. बोटांवर मोज्याइतकेच उद्योग जिल्ह्यात तग धरून आहेत. राजकिय वशिलेबाजी व शासनाची प्रचंड उदासिनतेमुळे जिल्ह्याचा विकास अंधातरी आहे. नावारूपास असलेले लोकप्रतिनिधी कामगारांच्या प्रश्नांबाबत तितकेच उदासीन आहेत. जिल्ह्यात अनेक संस्था, दुकाने, हॉटेल-उपहारगृहे, घरेलु कामगार, इतर संस्था व उद्योगधंद्यामधील कामगारांचा समावेश होतो. जवळपास १० हजारांच्या आसपास कामगारांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आहे. यात जिल्ह्यात नोंदणीकृत दुकानांची संख्या ६५६ असून कामगारांचीसंख्या १५९० आहे. व्यापारी संस्था १३९१ असून त्या अंतर्गत ४ हजार ९०६ कामगार आहेत. हॉटेल-उपहारगृहांची संख्या २७२ असून ५८१ कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर संस्था अंतर्गत १०१ कामगार कार्यरत आहे. या एकूण कामगारांची संख्या ७२२३ असून उद्योगात असलेल्या कामगारांची संख्या वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग बोटांवर मोजण्या इतपत आहे. यात अशोक लेलँड, सनफ्लॅग, हिंदुस्थान कंपोझिट, महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी, एलोरा पेपर मिल, चिखला माईन्स यासह अन्य उद्योग आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. याशिवाय लघु उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु बहुतांश कामगारांची नोंदणी शासन दप्तरी नाही. याशिवाय संघटनांच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या हजारो कामगार आजही योजनांपासून वंचित आहेत. घरेलु कामगारसह खाजगी व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामगारांना नेहमी मुलभूत सोयी सवलतीपासून वंचित ठेवले जाते. कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला दिला पाहिजे. कंपनी असो की कुठलीही आस्थापना कामगारांवर अन्याय न करता त्यांचा हक्काचा मोबदला दिला गेला पाहिजे. - श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, जिल्हा (इंजि.) कामगार संघ,भंडारा