शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल

By admin | Updated: September 22, 2015 00:45 IST

श्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की

इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराश्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की गरिब आपआपल्या परिने सर्वंच श्रम करतात. मात्र आजघडीला ‘गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहीे. जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात कामगारांची संख्या असून अद्यापही हजारो कामगारांची नोंद शासनदफ्तरी नाहीे. परिणामी केंद्र तथा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा खऱ्या कामगारांना मिळतो काय? हाच खरा सवाल आहे.भंडारा जिल्ह्यातील उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. बोटांवर मोज्याइतकेच उद्योग जिल्ह्यात तग धरून आहेत. राजकिय वशिलेबाजी व शासनाची प्रचंड उदासिनतेमुळे जिल्ह्याचा विकास अंधातरी आहे. नावारूपास असलेले लोकप्रतिनिधी कामगारांच्या प्रश्नांबाबत तितकेच उदासीन आहेत. जिल्ह्यात अनेक संस्था, दुकाने, हॉटेल-उपहारगृहे, घरेलु कामगार, इतर संस्था व उद्योगधंद्यामधील कामगारांचा समावेश होतो. जवळपास १० हजारांच्या आसपास कामगारांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आहे. यात जिल्ह्यात नोंदणीकृत दुकानांची संख्या ६५६ असून कामगारांचीसंख्या १५९० आहे. व्यापारी संस्था १३९१ असून त्या अंतर्गत ४ हजार ९०६ कामगार आहेत. हॉटेल-उपहारगृहांची संख्या २७२ असून ५८१ कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर संस्था अंतर्गत १०१ कामगार कार्यरत आहे. या एकूण कामगारांची संख्या ७२२३ असून उद्योगात असलेल्या कामगारांची संख्या वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग बोटांवर मोजण्या इतपत आहे. यात अशोक लेलँड, सनफ्लॅग, हिंदुस्थान कंपोझिट, महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी, एलोरा पेपर मिल, चिखला माईन्स यासह अन्य उद्योग आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. याशिवाय लघु उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु बहुतांश कामगारांची नोंदणी शासन दप्तरी नाही. याशिवाय संघटनांच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या हजारो कामगार आजही योजनांपासून वंचित आहेत. घरेलु कामगारसह खाजगी व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामगारांना नेहमी मुलभूत सोयी सवलतीपासून वंचित ठेवले जाते. कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला दिला पाहिजे. कंपनी असो की कुठलीही आस्थापना कामगारांवर अन्याय न करता त्यांचा हक्काचा मोबदला दिला गेला पाहिजे. - श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, जिल्हा (इंजि.) कामगार संघ,भंडारा