शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल

By admin | Updated: September 22, 2015 00:45 IST

श्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की

इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराश्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की गरिब आपआपल्या परिने सर्वंच श्रम करतात. मात्र आजघडीला ‘गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहीे. जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात कामगारांची संख्या असून अद्यापही हजारो कामगारांची नोंद शासनदफ्तरी नाहीे. परिणामी केंद्र तथा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा खऱ्या कामगारांना मिळतो काय? हाच खरा सवाल आहे.भंडारा जिल्ह्यातील उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. बोटांवर मोज्याइतकेच उद्योग जिल्ह्यात तग धरून आहेत. राजकिय वशिलेबाजी व शासनाची प्रचंड उदासिनतेमुळे जिल्ह्याचा विकास अंधातरी आहे. नावारूपास असलेले लोकप्रतिनिधी कामगारांच्या प्रश्नांबाबत तितकेच उदासीन आहेत. जिल्ह्यात अनेक संस्था, दुकाने, हॉटेल-उपहारगृहे, घरेलु कामगार, इतर संस्था व उद्योगधंद्यामधील कामगारांचा समावेश होतो. जवळपास १० हजारांच्या आसपास कामगारांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आहे. यात जिल्ह्यात नोंदणीकृत दुकानांची संख्या ६५६ असून कामगारांचीसंख्या १५९० आहे. व्यापारी संस्था १३९१ असून त्या अंतर्गत ४ हजार ९०६ कामगार आहेत. हॉटेल-उपहारगृहांची संख्या २७२ असून ५८१ कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर संस्था अंतर्गत १०१ कामगार कार्यरत आहे. या एकूण कामगारांची संख्या ७२२३ असून उद्योगात असलेल्या कामगारांची संख्या वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग बोटांवर मोजण्या इतपत आहे. यात अशोक लेलँड, सनफ्लॅग, हिंदुस्थान कंपोझिट, महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी, एलोरा पेपर मिल, चिखला माईन्स यासह अन्य उद्योग आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. याशिवाय लघु उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु बहुतांश कामगारांची नोंदणी शासन दप्तरी नाही. याशिवाय संघटनांच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या हजारो कामगार आजही योजनांपासून वंचित आहेत. घरेलु कामगारसह खाजगी व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामगारांना नेहमी मुलभूत सोयी सवलतीपासून वंचित ठेवले जाते. कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला दिला पाहिजे. कंपनी असो की कुठलीही आस्थापना कामगारांवर अन्याय न करता त्यांचा हक्काचा मोबदला दिला गेला पाहिजे. - श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, जिल्हा (इंजि.) कामगार संघ,भंडारा