शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:46 IST

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने गुरूवारला भंडारा तालुक्यातील परसोडी, तुमसर तालुक्यातील बिनाखी, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव व पालडोंगरी गावाला भेट देऊन शेतकºयांशी चर्चा केली.या भेटीत राज्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार उपस्थित होते. केंद्राच्या या पथकात नागपूरचे संचालक डॉ.आर.पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोईमतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ.ए. एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वराज, खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओमप्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन अधिकारी डॉ.तरूणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ राईस रिसर्चचे संचालक एस.आर. वोलेटी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लोखंडे, तहसिलदार संजय पवार व गजेंद्र बालपांडे उपस्थित होते.परसोडी येथे केंद्रीय पथकाने भेट देऊन ग्रामपंचायत भवनात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुडतुड्यामुळे झालेल्या धानाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकास माहिती दिली. धान पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी निधीचा प्रस्ताव पाठविला असून त्या अनुषंगाने पथक तपासणीसाठी आल्याचे पथकातील अधिकाºयांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरणे गरजेचे असल्याचे पथकाच्या सदस्यांनी सूचविले. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरावे, असे आवाहन केले. त्यानंतर बिनाखी, आंधळगाव व पालडोंगरीला भेट देऊन तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले.