शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारातील पक्के अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:09 IST

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक : अनेक अतिक्रमण भुईसपाट

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस पोलिस विभागाच्या संयुक्तपणे शहरातील राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण यापूर्वी काढण्यात आले होते. यात मात्र दुजाभाव केल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला होता. रस्त्याची मोजणी ते मार्किंगपर्यंतच्या कामात गौडबंगाल झाला, ही बाब नागरिकांनी खुलेआम बोलून दाखविली होती.अतिक्रमण करणे हा गुन्हा असताना तर गरिबांचीच अतिक्रमणे पाडण्यात येतात. श्रीमतांना मोहिमेपासून का वगळण्यात येते, असाही युक्तीवाद फुटपाथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेच्या वेळी केला होता. सदर दुजाभाव न करताना नियमानुसार सर्वांचेच अतिक्रमण हटविण्यात यावेत, अशी मागणी होती.यावर पालिकेने पुढाकार घेत शुक्रवारी कठोर भूमिका घेत सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरूवात केली. पाच फूटापर्यंत रेड मार्किंग केलेला भाग जेसीबीच्या सहायाने पाडण्यात आला. तणाव किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्ताची कमान भंडाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी स्वत: सांभाळली होती.कुणालाही झुकते माप नकोशुक्रवारपासून आरंभ झालेला अतिक्रमण हटाव मोहीम इमाने इतबारे राबविली जावी, अशी चर्चा नेहमीच असायची. परंतु असे व्हायचे नाही. शुक्रवारी सुरू झालेली मोहीम खºया अर्थाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली. रस्त्याच्या मध्यभागापासून मोजमाप झालेल्या लाल मार्किंगपर्यंत असलेले सर्व अळथडे जेसीबीने तोडून टाकले. अशीच कारवाई रस्त्याच्या दुसºया बाजुने जेव्हा सुरू होईल तेव्हापण कुणालाही झुकते माप देवू नका, अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पूर्णपणे निघाल्यावर त्याचे त्वरीतच बांधकामही सुरू होणार आहे. तद्वतच रस्त्याशी संबंधी असलेली नालीचेही बांधकाम केले जाणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा पाहण्यासारखा होता. यावेळी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.च्वर्षभरातील पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची ही चवथी मोहीम होती. यापुर्वी शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र विद्यमान घडीला स्थिती जैसे थे आहे. मध्यंतरी या मोहीमेनंतर शहरातील गल्लीबोडीतही अतिक्रमण काढण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरीलही अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अतिक्रमण हटावचा हा दरारा जास्त दिवस टिकू शकला नाही. निधीचा वाणवा व नियोजनाचा अभाव या दोन बाबींमुळे भंडारा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा कायम तेवत आहे. याकडे सर्वांनीच सहकार्य व पुढाकार घेवून समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.वाहतूक बंदसदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना पालिकेने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. परिणामी वाहतूक बंद असल्याने अनेकांना या मार्गावरील उपरस्त्यांचा आधार घ्यावा लागला. आता दुसºया बाजूकडे अतिक्रमण हटाव मोहिमेवर नागरिकांचे लक्ष लागले आहेत.