शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

भंडारा-पवनी महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

०१ लोक ०९ के भंडारा : भंडारा ते पवनी महामार्ग चिखलात बुडाला असून, सिमेंटच्या रोडऐवजी जागोजागी ...

०१ लोक ०९ के

भंडारा : भंडारा ते पवनी महामार्ग चिखलात बुडाला असून, सिमेंटच्या रोडऐवजी जागोजागी रस्त्यांचे खोदकाम केल्यामुळे पक्क्या रोडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रहदारी करण्यासाठी चिखलातून वाट शोधावी लागते. मात्र संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने अनेक नागरिकांची तारांबळ होत असून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे चित्र आंबाडी ते गिरोला मार्गावर दिसत आहे.

रोडची कामे करताना एका बाजूचे काम करून दुसरी बाजू रहदारीकरिता सुरळीत करणे आवश्यक असते. मात्र झोपलेल्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कंत्राटदारावर कोणाचाही अंकुश नसल्याने मनमर्जीप्रमाणे बांधकाम सुरू असून, चिखलाने माखलेला रस्ता दररोज अपघाताला आमंत्रण देत असून, एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

भंडारा-पवनी हा अत्यंत रहदारीची मार्ग असून मागील दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गावर सिमेंटच्या पक्क्या रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. यात कंत्राटदाराच्या नियोजनशून्यतेमुळे जागोजागी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले असल्याचा प्रकार लक्षात आला असून, आंबाडी ते गिरोला रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंटचे पक्के रस्ते पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र पावसाळा सुरू झाला असतानाही कंत्राटदार व प्रशासन झोपेत आहे.

रस्त्याचे बांधकाम करताना एका बाजूने रहदारीसाठी रस्ता ठेवून दुसऱ्या बाजूचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र येथील कंत्राटदाराचे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी आर्थिक साटेलोटे असल्याने अत्यंत वर्दळीचा महामार्ग असतानाही याकडे मुद्दाम डोळेझाक करीत असल्याची येथील नागरिकांची ओरड आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने नागरिकांचे हाल झाले असून नुकतेच कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात भंडारा शहराकडे कामाच्या शोधात येतो. मात्र रस्त्यावर पसरलेल्या चिखलाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी, तीनचाकी, सायकल आणि इतर छोटी वाहने चिखलात घसरून रोजच वाहतूक करणारे नागरिक चिखलात पडत आहेत.

बॉक्स

नागरिकांसाठी कर्दनकाळ

भंडारा-पवनी महामार्गावरील आंबाडी ते गिरोला तसेच इतरही ठिकाणी जागोजागी खोदलेला महामार्ग हा नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत असून, अपघाताला आमंत्रण देत आहे. नागरिकांचे जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन रस्त्यावरील चिखलाची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.