शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

तलावाचे डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:44 IST

एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा फटका । भंडारा शहरातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.भंडारा शहरात बोटांवर मोजण्याइतकेच तलाव नामशेष आहेत. त्यातही त्यांची देखरेख व दुरूस्ती होत नसल्याने तलावाला भकास स्वरूप प्राप्त झाले आहेत. मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, नवतलाव ही काही शहरातील तलावांची नावे असली तरी त्यांच्या देखभालीकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशेषत: मिस्किन टँक तलावाला अतिक्रमणाचा विळखा लाभला आहे.एकेकाळी विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या या तलावाला आता अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप मिळाले आहे. त्यातही सण, उत्सवानंतर या तलावातील गाळ व अन्य साहित्य उपसले जात नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ढिवरबांधवांना सदर तलाव लीजवर देण्यात येत असला तरी प्राप्त झालेल्या महसूलातून त्याची देखभाल मात्र होत नसल्याचे दृश्य आहे. तलावाच्या पाळीला लागूनच मोठ्या प्रमाणात गाळ, झाडीझुडपी व कचरा गोळा झाला आहे. या मिस्किन टँक बगीच्यात सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. बगीच्याची अवस्था काही प्रमाणात चांगली असली तरी बालकांची मनोरंजनात्मक खेळणीही नादुरूस्त आहे.त्यातही तलावाकडे बघितल्यास बगीच्याच्या सौंदर्यात भर पडण्यापेक्षा नागरिक तिथून निघून जाण्यात धन्यता मानतात. अनेक संघटना व नागरिकांनी या तलावासह बगीच्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेकडे सांगितले. मात्र त्यावर अजुनपर्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही.निधीचा वाणवा अपुर्ण मनुष्यबळ या कारणाने मिस्किन टँकचा उद्धार झालेला नाही. पालिका प्रशासनाने वार्षिक अर्थसंकल्पात तलावाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. सोबतच तलाव पाळीवर असलेले अतिक्रमण निर्मूलन करून विकासात्मक कार्यावर भर देणे महत्वाचे आहे. शहरातील अन्य तलावांच्या दुरूस्तीवरही भर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण