शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तलावाचे डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:44 IST

एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा फटका । भंडारा शहरातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.भंडारा शहरात बोटांवर मोजण्याइतकेच तलाव नामशेष आहेत. त्यातही त्यांची देखरेख व दुरूस्ती होत नसल्याने तलावाला भकास स्वरूप प्राप्त झाले आहेत. मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, नवतलाव ही काही शहरातील तलावांची नावे असली तरी त्यांच्या देखभालीकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशेषत: मिस्किन टँक तलावाला अतिक्रमणाचा विळखा लाभला आहे.एकेकाळी विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या या तलावाला आता अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप मिळाले आहे. त्यातही सण, उत्सवानंतर या तलावातील गाळ व अन्य साहित्य उपसले जात नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ढिवरबांधवांना सदर तलाव लीजवर देण्यात येत असला तरी प्राप्त झालेल्या महसूलातून त्याची देखभाल मात्र होत नसल्याचे दृश्य आहे. तलावाच्या पाळीला लागूनच मोठ्या प्रमाणात गाळ, झाडीझुडपी व कचरा गोळा झाला आहे. या मिस्किन टँक बगीच्यात सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. बगीच्याची अवस्था काही प्रमाणात चांगली असली तरी बालकांची मनोरंजनात्मक खेळणीही नादुरूस्त आहे.त्यातही तलावाकडे बघितल्यास बगीच्याच्या सौंदर्यात भर पडण्यापेक्षा नागरिक तिथून निघून जाण्यात धन्यता मानतात. अनेक संघटना व नागरिकांनी या तलावासह बगीच्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेकडे सांगितले. मात्र त्यावर अजुनपर्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही.निधीचा वाणवा अपुर्ण मनुष्यबळ या कारणाने मिस्किन टँकचा उद्धार झालेला नाही. पालिका प्रशासनाने वार्षिक अर्थसंकल्पात तलावाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. सोबतच तलाव पाळीवर असलेले अतिक्रमण निर्मूलन करून विकासात्मक कार्यावर भर देणे महत्वाचे आहे. शहरातील अन्य तलावांच्या दुरूस्तीवरही भर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण