शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही श्रेयासाठी राजकीय धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास काम पूर्ण झाले की, सुरु होते श्रेय लाटण्याची चढाओढ. सर्वत्र तीन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत आहे.

ठळक मुद्देविकासकामांचा डांगोरा : प्रकल्पाचे पाणी असो की बायपासचा प्रश्न,

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या सावटात असताना जिल्ह्यात मात्र लॉकडाऊनच्या काळातही श्रेयासाठी राजकीय धडपड सुरु आहे. आपणच प्रश्न कसा मार्गी लावला याचा डांगोरा पिटला जात आहे. प्रकल्पाचे सिंचनासाठी सोडलेले पाणी असो की भंडारा शहरातील बायपासचा प्रश्न. लहानसहान विकासकामातही एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात.भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास काम पूर्ण झाले की, सुरु होते श्रेय लाटण्याची चढाओढ. सर्वत्र तीन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत आहे. सर्वसामान्य कोरोनामुळे धास्तावलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना धीर देण्याऐवजी राजकीय नेते केवळ श्रेय घेण्यात मशगूल असल्याचे दिसत आहेत. पावसाने दडी मारल्याने धानाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. शेतकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करू लागले. प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या पद्धतीने वरिष्ठांना माहिती दिली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आपणच पाणी सिंचनासाठी सोडल्याचा डांगोरा पिटणे सुरु केले. काही ठिकाणी तर जलपूजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. शेतकऱ्यांना केवळ सिंचनासाठी पाणी हवे होते. मात्र या पाणी सोडण्यातही राजकारण करून श्रेय लाटण्याची मोठी स्पर्धा दिसून आली. भंडारा शहरातील बायपासचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. अलिकडे राष्ट्रीय महामार्गाला सहापदरी बायपास आणि भंडारा-तुमसर बायपास मंजूर झाला. यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी निश्चितच प्रयत्न केले. त्यांना यशही आले. परंतु हे कुण्या एकट्याचे यश नसून सर्वांनी एकत्र येऊन सोडविलेला प्रश्न आहे. मात्र मंजुरीपासून ते निधी मिळविण्यापर्यंत आपणच कसा पाठपुरावा केला याचा लेखाजोखा प्रसिद्धीमाध्यमातून जनतेपुढे मांडण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी केला आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नातही असेच केले जात आहे. कोणताही विकासाचा प्रकल्प आला की, त्याचे श्रेय लाटण्यासाठी येथे कायम स्पर्धा असते. विकास व्हावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु विकासाआड श्रेय लाटणे कितपत योग्य आहे असा सवाल पुढे येत आहे.अपूर्ण प्रकल्पाचे श्रेय कुणाला?जिल्ह्यात अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. निधीअभावी या प्रकल्पांना गती मिळत नाही. मात्र हा प्रकल्प का अपूर्ण आहे याचा कुणी विचार करताना दिसत नाही. गोसे प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न कायम आहे. तणसापासून इथेनॉलचा प्रकल्प सर्वांच्या विस्मरणात गेला आहे. भंडारा शहरातील महिला रुग्णालयाचा प्रश्नही अधांतरी आहे. धान खरेदीसाठी गोदामाचा तुटवडा दरवर्षी जाणवतो. परंतु या बाबींकडे कुणाचेही लक्ष नाही. मात्र यातील एखादा प्रकल्प पूर्ण झाला की मग मात्र श्रेय घेण्यासाठी सर्वच पुढे येतात. गत काही वर्षात श्रेयाची ही लढाई सर्वसामान्यांसाठी मनोरंजनाचा विषय होऊ पाहत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या