शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले

By admin | Updated: August 30, 2016 00:17 IST

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती.

साकोलीत जाहीर सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादनसाकोली : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आश्वासने महाराष्ट्र सरकारने पाळली असली तरी लोकहिताच्या प्रमुख तीन आश्वासने पाळू शकली नाही. विदर्भातून गठ्ठा मते घेऊन गेलेले विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर भुलथापा देऊन राजकारण झाले. या विदर्भात सर्वच जाती धर्माची लोक एकत्रित राहतात. हिंदु-मुस्लिम दंगलीची एकही घटना घडली नाही. व भविष्यात घडणार नाही ही विदर्भवासीयांची ताकद आहे, असे प्रतिपादन माजी महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. लहरीबाबा मठ देवस्थान परिसर साकोली येथे वेगळ्या विदर्भासाठी आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, अनील जवादे, निरंजन खांदेवाले, सुरेद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोतरे, छौलबिहारी अग्रवाल, डॉ. गोविंद कोंडवाने, गुरुमत सिंह चावला, कमलेश भजनकर, उर्मिला आगाशे, तालुका अध्यक्ष प्रविण भांडारकर उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापुर्वी वेगळ्या विदर्भासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र ऐनवेळीच या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भासाठी काढता पाय घेतला. यापुर्वी विदर्भासाठी आंदोलन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती वेळेस नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना शासकीय निमशासकीय शाळामहाविद्यालय व कार्यालयात २३ टक्के आरक्षण देण्याचा नियम असतांना या नियमाचे उल्लंघन होत आहे. हा विदर्भवासीयांवर एकप्रकारचा अन्याय आहे. त्यामुळे आता वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय विदर्भाचा विकास होऊच शकत नाही. असे साक्ष विदर्भवासीयांनी आता एकत्र येवून ताकद दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. सभेच्या पूर्वी वेगळ्या विदर्भासाठी रॅली काढण्यात आली. संचालन राकेश भास्कर यांनी केले. या कार्यक्रमाला शब्बीरभाई पठाण, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, मनोज कटकवार, यशपाल कऱ्हाडे, विनोद भुते यांच्यासह मोठ्यासंख्येने लोक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाला तालुका अधिवक्ता संघाचा पाठिंबासाकोली तालुका अभिवक्ता संघाने पृथक विदर्भ राज्याच्या आंदोलनाला समंती दर्शविलेली असून तसा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविलेला आहे. त्यामुळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी साकोली अधिवक्ता संघाचा पाठिंबा अ‍ॅड. अणेना साकोलीच्या जाहिरसभेत दर्शविण्यात आला. यावेळी अ‍ॅड. बापूसाहेब अवथरे, अ‍ॅड.अण्णा परशुरामकर, अ‍ॅड.सुरेश पाटील, अ‍ॅड टी. जे. गिऱ्हेपुंजे, अ‍ॅड. अशोक करवडे, अ‍ॅड. भार्गेश्वर भुरले, अ‍ॅड. एम. एम. गणवीर, अ‍ॅड. बी. संग्रामे उपस्थित होते.