शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

प्रवासी वाहनधारकांना पोलिसांचा अल्टीमेट

By admin | Updated: January 6, 2016 00:44 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला.

दस्तऐवजांवर करडी नजर : ४० पैकी २८ प्रवासी वाहने बंदचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला. आता त्याचा धसका पोलीस प्रशासन व काळी-पिवळी प्रवासी वाहनधारकांनी घेतला. आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचा अल्टीमेटम पोलिसांनी काळी-पिवळी प्रवासी वाहनाच्या मालक व चालकांना दिला आहे.सरत्या वर्षाच्या शेवटी शाळेत जात असताना तुमसर बपेरा राज्य मार्गावर बिनाखी गावात काळी-पिवळी वाहनाने पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशी वाहने भरधाव धावत असल्यामुळे नाहक जीव गमवावा लागत असल्यामुळे बिनाखीवासीयांनी काळी-पिवळी या प्रवासी वाहतूक विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय राज्य मार्गावरुन काळी-पिवळी प्रवासी वाहन गावात शिरणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. या निर्णयाने पोलीस प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान तुमसर बपेरा राज्य मार्गावर ४० हून अधिक काळी-पिवळी या प्रवाशी वाहने आहेत. अनेक वाहनांचा विमा नाही, परवाने नाही अन्य दस्तऐवज उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. वाहकाजवळ परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वाहनानी अपघात झाल्यास विमा कंपनीमार्फत मदत दिली जात नाही असे अनेक कारणे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी वाहन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे वाहनाचे मालक व वाहक चांगलेच हादरले आहेत. तुमसर बपेरा राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करतांना आवश्यक दस्तऐवज आणि पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करण्याचे फर्मान काळी-पिवळी वाहन मालकांना देण्यात आले आहे.वाहन व प्रवासी, वाहकांचा विमा, परवाना प्राप्त वाहक तथा अन्य वाहतुकीस लागणारे दस्ताऐवज तयार करण्याचे बजाविण्यात आले आहे. असे निर्देश देताच तुमसर बपेरा राज्य मार्गावरील काळी-पिवळी वाहनात कमालीची घट झाली आहे. ४०पैकी फक्त १० ते १२ वाहन या निकष आणि नियमाचे पालन करित असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच वाहन सद्यस्थित राज्य मार्गावर प्रवासाी वाहतुक करीत आहे. उर्वरित २८ काळी-पिवळी वाहन धारकांनी घरांची वाट धरली आहे. यावरुन अनेक वर्षापासून नादुरुस्त वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांनी प्रवास केल्याचे लक्षात येत आहे. अनेक वाहनाचे दरवाजे व अन्य साहित्य भंगारात निघाली आहेत. संपूर्ण वाहन नादुरुस्त असतांना काळी-पिवळी वाहन मालक वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रवासी वाहतूक चिंताजनक झाली आहे. (वार्ताहर)