शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

प्रवासी वाहनधारकांना पोलिसांचा अल्टीमेट

By admin | Updated: January 6, 2016 00:44 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला.

दस्तऐवजांवर करडी नजर : ४० पैकी २८ प्रवासी वाहने बंदचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला. आता त्याचा धसका पोलीस प्रशासन व काळी-पिवळी प्रवासी वाहनधारकांनी घेतला. आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचा अल्टीमेटम पोलिसांनी काळी-पिवळी प्रवासी वाहनाच्या मालक व चालकांना दिला आहे.सरत्या वर्षाच्या शेवटी शाळेत जात असताना तुमसर बपेरा राज्य मार्गावर बिनाखी गावात काळी-पिवळी वाहनाने पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशी वाहने भरधाव धावत असल्यामुळे नाहक जीव गमवावा लागत असल्यामुळे बिनाखीवासीयांनी काळी-पिवळी या प्रवासी वाहतूक विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय राज्य मार्गावरुन काळी-पिवळी प्रवासी वाहन गावात शिरणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. या निर्णयाने पोलीस प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान तुमसर बपेरा राज्य मार्गावर ४० हून अधिक काळी-पिवळी या प्रवाशी वाहने आहेत. अनेक वाहनांचा विमा नाही, परवाने नाही अन्य दस्तऐवज उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. वाहकाजवळ परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वाहनानी अपघात झाल्यास विमा कंपनीमार्फत मदत दिली जात नाही असे अनेक कारणे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी वाहन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे वाहनाचे मालक व वाहक चांगलेच हादरले आहेत. तुमसर बपेरा राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करतांना आवश्यक दस्तऐवज आणि पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करण्याचे फर्मान काळी-पिवळी वाहन मालकांना देण्यात आले आहे.वाहन व प्रवासी, वाहकांचा विमा, परवाना प्राप्त वाहक तथा अन्य वाहतुकीस लागणारे दस्ताऐवज तयार करण्याचे बजाविण्यात आले आहे. असे निर्देश देताच तुमसर बपेरा राज्य मार्गावरील काळी-पिवळी वाहनात कमालीची घट झाली आहे. ४०पैकी फक्त १० ते १२ वाहन या निकष आणि नियमाचे पालन करित असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच वाहन सद्यस्थित राज्य मार्गावर प्रवासाी वाहतुक करीत आहे. उर्वरित २८ काळी-पिवळी वाहन धारकांनी घरांची वाट धरली आहे. यावरुन अनेक वर्षापासून नादुरुस्त वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांनी प्रवास केल्याचे लक्षात येत आहे. अनेक वाहनाचे दरवाजे व अन्य साहित्य भंगारात निघाली आहेत. संपूर्ण वाहन नादुरुस्त असतांना काळी-पिवळी वाहन मालक वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रवासी वाहतूक चिंताजनक झाली आहे. (वार्ताहर)