शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पोलीस क्रीडासत्राचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:15 IST

पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, ......

ठळक मुद्देसांघिक खेळाचा समावेश : विजेत्या चमूंना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक साहू यांनी कर्मचाºयांना खेळाचे महत्त्व व फायदे सागताना म्हटले की, परिस्थिती ही नेहमी बदलत असते व त्यानुसार बदलणे आवश्यक असते.एका खेळाडू महिलेचे उदाहरण देतानी सांगितले की, या महिलेने रेल्वे अपघातात तिचे दोन्ही पाय गमावले होते. तरीपण ती निराश न होता स्वत:च्या खंबीर आत्मविश्वासाच्या बळावर तिने एव्हरेस्ट शिखर सर केले. आशावादी उदाहरणांना समोर ठेवून उत्कृष्ट कामगिरी खेळामध्ये दाखवावी, असे बोलून प्रेरीत केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.त्यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील पाच उपविभागांच्या खेळाडूंसह सदर स्पर्धेत १५० खेळाडूंनी भाग घेतला. पोलीस मुख्यालय, उपविभाग भंडारा, उपविभाग तुमसर, उपविभाग साकोली, उपविभाग पवनी येथील पोलीस पुरुष व पोलीस महिला यांचा समावेश होता.यामध्ये सांघिक खेळ हॉकी, फुटबॉल, हॉलिबॉल, बॉस्केटबॉल, हॅन्डबाल, कबड्डी, खो-खो, तसेच वैयक्तिक खेळामध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, १५००० मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर रिले, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, तिहेरी उडी यामध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस रश्मी नांदेडकर तसेच पोलीस महिला कर्मचारी व कर्मचाºयांचे कुटूंबातील व्यक्तींचा खेळात समावेश करण्यात आला होता. रस्साखेच स्पर्धेमध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश भंडारा साहेब व पोलीस अधिकारी यांनी भाग घेवून स्पर्धेला प्रोत्साहन दिले. या स्पर्धेमध्ये बेस्ट अ‍ॅथलॉटिक्स पुरुष पो.शि. महेश नैताम व बेट अ‍ॅथलॉटिक्स महिला पोलिस शिपाई माधुरी चामट यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. तसेच चारही उपविभागापैकी पोलीस मुख्यालय येथील खेळाडु कर्मचारी यांनी प्रथम पारितोषिक मिळविलेले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी भाषणातून मनापासुन स्वागत केले. तसेच पोलिसाबद्दल सागताना, पोलीस जर नसले तर जनतेत गुन्हेगारी वाढणार तसेच पोलीसांची डयुटीची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.