शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तंटामुक्त मोहिमेला पोलिसांचेच असहकार्य

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे.

भंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पोलिसांची महत्वाची भूमिका असली तरी पोलिस प्रशासन मात्र फारसी सहकार्याची भावना ठेवत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. एखादा तंटा सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीसमोर आला तर तंटामुक्त समितीला विचारपूर्वक आणि सदसद्विवेकबुध्दीला स्मरुन निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी दोन्ही पक्षांना मान्य होईल, अशी समाधानकारक तडजोड समितीला करावी लागते. जनतेला पोलिस ठाणे, न्यायालयाच्या वाटा मोकळ्या असल्या तरी पैसा व वेळेची नासाडी आणि मानसिक त्रास कुणालाच नको असतो. तंटामुक्त समिती समित्यांना प्रोत्साहन तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात पोलिस प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. मात्र काही अपवाद वगळले तर पोलीस वर्तुळात तंटामुक्तीविषयी निरुत्साह असल्याचे बहुतांश अध्यक्ष सांगतात. लाखो लोकसंख्या असलेल्या जिल्हयाची कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. तंटामुक्ती गाव समितीची अंमलबजावणीचे काम स्थानिक पातळीवर पोलिस स्टेशनमधील गोपनीय शाखेच्या एक किंवा दोन कर्मचाऱ्यांकडे देण्यात येते. इतर कामाबरोबरच तंटामुक्तीचे अतिरिक्त काम कर्मचारी करीत असले तरी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या ज्ञानाबरोबरच सामाजिक सुसंवादाचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्याकडे तंटामुक्तीची जबाबदारी सोपविण्यास तंटामुक्तीचे काम अधिक प्रभावी होऊ शकते. काळाची महिमा म्हणा अगर आधुनिक पहाटेच्या उजेडासोबतच गावचे गावपण हरवत चालले आहे. काही वर्षापूर्वी सगळे गाव शेजारच्या घरातील दु:खाचा आलेखही शेजारच्या चेहऱ्यावर उमटत नाही. त्यामुळे सत्ता, राजकारण जातीयवादामुळ विस्कटलेली गावाची घडी नीट बसविण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान हाती घेतले आहे. त्यामुळेच हे अभियान एक मोहीम न राहता तंटामुक्ती वास्तवात उतरल्यास महात्मा गांधीच्या स्वप्नातला भारत साकार होण्यास वेळ लागणार नाही. (नगर प्रतिनिधी)