शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

पोलीस हेल्पलाइन कक्ष पोलिसांसाठी ठरला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध मंत्री दौऱ्यावर राहिले. यामुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीच घेता आली नाही. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ होते. जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात हेल्पलाइन कक्षात वर्षभरात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ठळक मुद्देसाहेब माझी वेतननिश्चिती झाली नाही : वर्षभरात ७६ तक्रारींचे निवारण

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपली तक्रार देता यावी यासाठी शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस हेल्पलाइन कक्षाची स्थापना केली आहे. अनेक पोलीस कर्मचारी  हेल्पलाइनवर तक्रार करतात. यात मेडिकल बिल, पदोन्नतीच्या तक्रारी, तसेच वेतननिश्चिती, किरकोळ रजा मिळण्यासाठी अशा विविध तक्रारींचा समावेश असतो. तक्रारींची दखल घेत अनेक निवारण होत असल्याने ही हेल्पलाइन पोलिसांसाठी आधार ठरली आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध मंत्री दौऱ्यावर राहिले. यामुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीच घेता आली नाही. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ होते. जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात हेल्पलाइन कक्षात वर्षभरात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक २१ तक्रारी मिळाल्या. त्यानंतर फेब्रुवारी १२, मार्चमध्ये चार, एप्रिल महिन्यात पाच, मे महिन्यात तीन, जून १३, जुलै पाच, ऑगस्टमध्ये पाच, सप्टेंबर महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. ऑक्टोबर,  नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी तीन तक्रारी तर डिसेंबरअखेर चार तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या होत्या. यातील ७६ तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. मात्र काही कारणास्तव वेतननिश्चितीची  दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करणारा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या बाबूंविषयी  नाराजी असल्याचे दिसून येते. अनेकदा सेवानिवृत्तीनंतर आपली पेन्शन, फंड,  आपली मेडिकल बिले लवकर मंजूर करताना अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना बाबूंकडून वेठीस धरल्याचीही माहिती आहे. असे असले तरी ही हेल्पलाइने आधार ठरत आहे.

७६ तक्रारींचे निवारण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त  तक्रारींमध्ये विविध पुरुष, महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. वर्षभरात शहरात वर्षभरात ७८ तक्रारींपैकी ७६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. राज्यात इतर जिल्ह्याची तुलना करता भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात चांगले यश मिळवले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस येथे तक्रार करून आपली माहिती देतात.

पोलीसाला अश्रू अनावर पोलीस म्हटले, धडकी भरवणारा आवाज हा ठरलेला. मात्र त्या पोलिसालाही  भावना असतात. याचा प्रत्यय आला. एका पोलीस आपले अनुभव कथन करताना कधी व्यसन केले नाही, सुपारी  खाल्ली नाही. एक दिवस दुचाकीवरून जात असताना वन्यप्राण्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालो. त्यावेही रूग्णालयाचे बिल सहकाऱ्यांनीच भरले. माझे मेडिकल बिल प्रलंबित आहे, अशी भावना बोलून दाखवताना एका पोलिसाला अश्रू अनावर झाले.

 

टॅग्स :Policeपोलिस