शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:37 IST

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन हजार दंड वसूल : लवकरच नागरिकांवरही होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.मोटार वाहन अपघातात सर्वाधिक मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. परंतु सामान्य जनतेवर कारवाई करण्यापूर्वी ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी १ आॅक्टोबर पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चालविताना हेल्मेट सक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी गृहविभागाचे उपअधीक्षक बी.डी. बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक गाडे व पथकाने कारवाई केली. सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तीन हजार रुपये वसुल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबतच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय दर्जाचे हेल्मेट भंडारा पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.दुचाकी चालकांनो हेल्मेट वापराचजिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दुचाकी अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला इजा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुचाकी घेऊन बाहेर जाताताना आयएसआय दर्जाचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.