शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:37 IST

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन हजार दंड वसूल : लवकरच नागरिकांवरही होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.मोटार वाहन अपघातात सर्वाधिक मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. परंतु सामान्य जनतेवर कारवाई करण्यापूर्वी ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी १ आॅक्टोबर पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चालविताना हेल्मेट सक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी गृहविभागाचे उपअधीक्षक बी.डी. बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक गाडे व पथकाने कारवाई केली. सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तीन हजार रुपये वसुल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबतच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय दर्जाचे हेल्मेट भंडारा पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.दुचाकी चालकांनो हेल्मेट वापराचजिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दुचाकी अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला इजा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुचाकी घेऊन बाहेर जाताताना आयएसआय दर्जाचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.