शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पट्टा पद्धतीने उन्हाळी धानाची रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST

२८लोक २६ के पालांदूर : खरीप हंगामात तुडतुडा मावा , महापुराने धानाचा हंगाम सुमार संकटात आला. अर्ध्या उत्पन्नावर समाधान ...

२८लोक २६ के

पालांदूर : खरीप हंगामात तुडतुडा मावा , महापुराने धानाचा हंगाम सुमार संकटात आला. अर्ध्या उत्पन्नावर समाधान ठेवावे लागले. ती भरपाई काढण्याच्या अपेक्षेने उन्हाळी हंगामात धान उत्पादक शेतकरी सरसावलेला आहे. पट्टा पद्धतीचा अवलंब करीत रो वणी सरळ रेषेत दोरीच्या आधाराने करीत आहे.

चुलबंद खोऱ्यात उन्हाळी रोवणीचा हंगाम धडाक्यात सुरू झालेला आहे. सुमारे ११९० हेक्टरवर रोवणीचे नियोजन केले आहे.

पट्टा पद्धत अवलंबन करिता तालुका कृषी अधिकारी पद्माकर गीदमारे, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक चुडामन नंदनवार, कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, नरेंद्र खंडाईत आदींच्या मार्गदर्शनात चुलबंद खोऱ्यात पट्टा पद्धत रुढ होत आहे.

पारंपारिक पद्धतीत काही सुधारणा अवलंबत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धानाचा हंगाम राबविला जात आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालय अंतर्गत सुमारे ५२ गावात ११९० हेक्टरवर उन्हाळी धानाचा हंगाम नियोजित आहे. हुंडा पद्धत २५०० प्रति एकर दराने रोवणी सुरू आहे. मजूर पद्धतीने १३० रुपये रोजाने महिला मजुरांच्या आधाराने रोवणी केले जात आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये नर्सरी तयार केलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीचा हंगाम सुरू केलेला आहे. कडधान्य काढणे व रोवणी एकाचवेळी आल्याने मजूर टंचाईचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.

इंधन दरवाढीचा फटका

शेतीकरिता ट्रॅक्टर हा वरदान ठरलेला आहे

इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना भाड्यातसुद्धा वाढ करणे साहजिकच आहे. दर तासाला शंभर रुपयाची वाढ ट्रॅक्टर मालकाने केली आहे. यामुळे उत्पादन खर्चात नक्कीच वाढ झालेली आहे.

पट्टा पद्धतीचे फायदे

पट्टा पद्धतीमुळे कीड-रोग नियंत्रणाकरिता शून्य खर्चातील नैसर्गिक उपाययोजना अत्यंत लाभदायी ठरलेली आहे. या पद्धतीमुळे धानाच्या बुंध्याला सूर्यप्रकाश स्पष्ट मिळत असतो. खत घालने, तण काढणे, फवारणी करणे सोपे जाते. कीड-रोग अभ्यासाकरिता उभ्या धानात नुकसान न होता अभ्यास करायला वाव मिळतो. रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता पट्टा पद्धतीचा अपेक्षित लाभ होतो. दहा ओळीनंतर एक फुटाचा पट्टा सोडून नियमित लागवड अपेक्षित आहे. फार पूर्वीसुद्धा दोरीच्या आधाराने रोवणीकरिता धानाची शेती केली जायची. मात्र मधल्या काळात पुन्हा ती पद्धत दुर्मिळ होत गेली. परंतु आता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सरळ दोरीचा रेषेत पट्टा पद्धतीचे आधाराने दोन्ही हंगामात धानाची रोवणी केली जात आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मौलिक ठरत आहे.

किमान महिनाभर रोवणीत पाणी अत्यल्प ठेवा

रोहिणी नंतर किमान महिनाभर बांध्यात अधिक पाणी भरून ठेवू नये. अधिक पाण्यामुळे धानाच्या बुंध्याला अपेक्षित फुटवे येत नाही. फुटवे अधिक न आल्यास उत्पन्नात अपेक्षित भर पडत नाही. तसेच रोगराईकरिता आमंत्रण येते. त्यामुळे अधिक फुटल्याकरिता व रोगराईच्या नियंत्रणाकरिता किमान महिनाभर तरी धानाच्या बांधानात पाणी साचून ठेवू नये.

कृषी अधिकाऱ्यांच्या अभ्यासात उन्हाळी धानाचा हंगाम कसलेला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात पट्टा पद्धतीचा अवलंब करीत रोवणी केली आहे. इतरही शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीत धान लागवड करून नवीन अभ्यास स्वीकारावा.

गोकुळ राऊत पालांदूर.